शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याचा विकास करणार-वनगा

By admin | Updated: November 2, 2015 01:32 IST

जिल्ह्यातील आठही तालुक्यांना समान न्याय देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. त्यासाठी पूर्ण पालघर जिल्ह्यात सुंदर आणि भक्कम असे रस्त्यांचे जाळे तयार करून सर्वांगीण विकास साधण्याचा

पालघर : जिल्ह्यातील आठही तालुक्यांना समान न्याय देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. त्यासाठी पूर्ण पालघर जिल्ह्यात सुंदर आणि भक्कम असे रस्त्यांचे जाळे तयार करून सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री तथा आदीवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी पालघर येथे केले.राज्य शासनाच्या वर्षापूर्तीचे औचित्य साधून पालकमंत्री सवरा यांच्या हस्ते प्रतिकात्मक स्वरुपात पालघर येथील गणेशकुंड येथे अंदाजीत १३ कोटी ८३ लाखांच्या २२ विकास कामांचा शुभारंभ शनिवारी झाला. यावेळी खासदार चिंतामण वनगा, नगराध्यक्ष प्रियंका पाटील, जि.प. अध्यक्षा सुरेखा थेतले, जिल्हाध्यक्ष उत्तम पिंपळे, सभापती रविंद्र पागधरे, कार्यकारी अभियंता राहुल वसईकर, उदय पालवे, तहसीलदार चंद्रसेन पवार आदी मान्यवर उपस्थित होते. रस्त्यांशिवाय जिल्ह्यात पर्यटन केंद्र म्हणून विकास होणार नाही. याची जाणीव ठेऊन सुंदर आणि भक्कम अशा रस्त्यांचे जाळे तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे. पालघर शिरगाव रस्ता, पारगाव फाटा ते सोनावे दारशेत रस्ता, केळवा स्टेशन ते केळवा दांडा रस्ता, झाई बोर्डी रेवस रेड्डी रस्ता, संजाण-तलासरी-कासा रस्ता, वासगाव रस्ता, बावडा गावांतर्गत रस्ता, बोईसर, आळेराडी, मुरसे, खारेकुरण रस्ता, सायवन किन्हवली रस्त्यावरील पूल आदी २२ विकासकामांचे भुमीपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले.