शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
2
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
3
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
4
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
5
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
6
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
7
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
8
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
9
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
10
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
11
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
12
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
13
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
14
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
15
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
16
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
17
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
18
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
19
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
20
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

शहापूरचे दापूर गाव महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे महिन्यांपासून अंधारात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 2:47 PM

Shahapur News : महावितरण विभागाची हलगर्जी व निष्काळजी कारणीभूत असल्याचा आरोप त्रस्त गावकऱ्यांकडून केला जात आहे.

ठाणे - शहापूर तालुक्यातील दापूर गावाला वीज पुरवठा करणारे वीज रोहित्र (डेपो) झाल्यामुळे येथील गावकरी एक महीन्यापासून अंधारात आहे. याला महावितरण विभागाची हलगर्जीपणा व निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप त्रस्त गावकऱ्यांकडून केला जात आहे. जंगल, दऱ्याखोऱ्यातील या गावातील रहिवाशांना साप, विंचू, किडे आदी जीव घेणाऱ्या सरपटणाऱ्या जनावरांच्या भीतीने येथील रहिवासी जीव मुठीत घेऊन या पावसात वावरत आहेत. सततच्या पावसाने बियांमध्ये पाणी शिरल्याने सरपटणारे प्राणी गावाकडे, घरांच्या आसऱ्याला, कोरड्या जागेच्या शोधात या परिसरात वावरत आहेत. गवतात, झाडाझुडुपांमध्ये ते सरपटताना दिसत आहे.

रात्री अंधारात दंश करून ते जीव घेण्याची भीती या गावकऱ्यांना सतावत आहे. महिन्यापासून अंधारात चाचपडत असलेल्या या गावकऱ्यांनी महावितरणच्या खर्डी येथील कार्यालयात कैफियत मांडून, पाठपुरावा करुनही वीज पुरवठा पूर्ववत झाला नसल्याची खंत येथील जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. येथील ७५ घरांमधील लहानथोर मिळून एक हजार लोकसंख्येच्या या गावाला एक महिन्यापासून अंधारात राहावं लागत असल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण गाव अंधारात असल्याने येथील शेतकरी, कष्टकरी, महिला, लहान मुले आदींना जीव घेण्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या वीज मंडळाच्या खर्डी कार्यलयाला वारंवार तक्रार करूनही दाद दिली जात नाही. या दापूर गांवाला वीज पुरवठ्या अभावी अंधाराबरोबर विविध समस्यांशी संघर्ष करावा लागत आहे. 

वीजे अभावी गिरण्या बंद आहेत. त्यामुळे ज्वारी, बाजरी, तांदूळ देण्यासाठी अन्य गावांमध्ये, खर्डीला पायपीट करावी लागत आहे. मोबाईल चार्ज नसल्याने रात्री बेरात्री, संकटकाळी संपर्क करणे शक्य नाही. यावर वेळीच लक्ष केंद्रीत करण्यासाठी खर्डी घ्या वीज कार्यालयाचे लक्ष वेधले आहे. मात्र अजूनही त्यांनी वीज पुरवठा सुरळीत केला नसल्याची खंत येथील संतोष शिगवा, गणेश वाघ यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. या वीज पुरवठ्या अभावी उद्भवणाऱ्या संकटास महावितरणला जबाबदार धरण्याचा इशारा या त्रस्त गावकऱ्याकडून दिला जात आहे.  

टॅग्स :electricityवीजShahapurशहापूरthaneठाणे