Lokmat AI ची अद्भूत दुनिया: 'एआय' : मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा नवा मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 13:23 IST2026-05-07T13:22:57+5:302026-05-07T13:23:31+5:30
Lokmat AI ची अद्भूत दुनिया: वनसंवर्धन म्हणजे फक्त प्राणी वाचवणे नाही, तर माणसांचे संरक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: 'एआय' : मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा नवा मार्ग
Lokmat AI ची अद्भूत दुनिया: भारतामध्ये वनसंवर्धनाचा प्रश्न केवळ झाडे आणि प्राणी वाचविण्यापुरता मर्यादित नाही. तो माणूस आणि वन्यजीव यांच्यातील संतुलनाचा प्रश्न आहे. अनेक भागांत बिबट्या गावात येतो, हत्तींचे कळप शेतात घुसतात, रस्त्यांवर प्राण्यांचे अपघात होतात आणि कधीकधी माणसांचे प्राणही जातात. या संघर्षात दोन्ही बाजूंचे नुकसान होते. शेतकऱ्यांचे पीक नष्ट होते, कुटुंबांवर संकट येते आणि दुसरीकडे प्राण्यांनाही जीव गमवावा लागतो. म्हणून वनसंवर्धन म्हणजे फक्त प्राणी वाचवणे नाही, तर माणसांचे संरक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
पूर्वी वनसंवर्धन म्हणजे गस्त, पहारा आणि अनुभव यांवर आधारित व्यवस्था होती. वनरक्षकांना मोठ्या क्षेत्रावर लक्ष ठेवावे लागे; पण आता 'एआय' म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता एक महत्त्वाचा सहायक ठरू शकतो. 'एआय' भविष्य पाहत नाही; पण तो भूतकाळातील माहितीचा अभ्यास करून शक्यता सांगतो. एखादा बिबट्या वारंवार एका भागात दिसत असेल किंवा हत्तींचा कळप ठराविक मार्गाने जात असेल, तर 'एआय' त्या हालचालींचा नमुना ओळखू शकतो. त्यामुळे संघर्ष होण्याआधीच सावधगिरी घेणे शक्य होते.
भारतात 'एआय'चा सर्वांत मोठा उपयोग म्हणजे संघर्ष टाळणे. प्राणी आणि माणूस यांच्यातील संघर्ष घडल्यानंतर उपाय करण्यापेक्षा तो आधीच टाळणे अधिक महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, जीपीएस कॉलर लावलेल्या हत्तींच्या हालचाली एआय विश्लेषित करू शकतो. जर हत्ती गावाजवळ येत असतील तर आधीच सूचना देता येते. गावकऱ्यांना सावध राहून अपघात टाळता येतात.
मोबाइल तंत्रज्ञानामुळे हे सोपे झाले आहे. एखाद्या भागात वन्यजीवांची हालचाल दिसल्यास स्थानिकांना संदेश पाठवता येतो. काही मिनिटांत गावाला माहिती मिळू शकते. वन्यजीव आणि रस्ते येथेही मोठा संघर्ष आहे. अनेक प्राणी रस्ता ओलांडताना मारले जातात. 'एआय' उपग्रह चित्रे आणि सेन्सर डेटाचा अभ्यास करून प्राणी वारंवार रस्ता ओलांडतात तो भाग ओळखू शकतो. त्या ठिकाणी अंडरपास किंवा ओव्हरपास तयार करता येतात. यामुळे अपघात कमी होतील.
मानव-वन्यजीव संघर्ष 'एआय'मुळे कसा कमी होईल?
प्राण्यांच्या हालचालींचा अंदाज घेणे.
गावांना वेळेवर सूचना देणे.
रस्त्यांवरील अपघातप्रवण भाग ओळखणे.
शिकारीची शक्यता ओळखणे.
वनाग्नी लवकर शोधणे.
कॅमेरा ट्रॅप डेटा जलद विश्लेषण.
गस्त नियोजन सुधारणे.
वनरक्षकांची सुरक्षितता वाढवणे.
भारतात करता येण्यासारखे उपाय
वनक्षेत्राचा डिजिटल नकाशा तयार करणे.
गावांसाठी एआय आधारित सूचना प्रणाली.
प्राण्यांच्या मार्गांचे वैज्ञानिक नियोजन.
ड्रोन आधारित नियमित निरीक्षण.
शेतकऱ्यांच्या नुकसानीचे जलद मूल्यांकन.
वनरक्षकांसाठी स्मार्ट मोबाइल अॅप.
विद्यार्थ्यांसाठी वनडेटा शिक्षणात वापरणे.
स्थानिकांचा सहभाग.
Moral Story
Rohan lived in a village near a forest where wild animals sometimes wandered close to homes. One evening, villagers received a mobile alert warning that elephants were moving nearby. While some people ignored it, Rohan convinced his family to stay indoors and move their crops safely. Later that night, elephants passed quietly through the fields without harming anyone. The next day the forest officer explained that Al tracking had helped send the warning. Rohan realized that technology can protect both people and animals when used wisely. He learned that real safety comes from awareness, cooperation, and respect for nature.
- अजिंक्य देशमुख