शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शरद बनसोडे यांचा नागरी सत्कार

By admin | Updated: May 30, 2014 01:15 IST

भारतीय जनता पार्टी : मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव

सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल नूतन खासदार अ‍ॅड. शरद बनसोडे यांचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर भाजपाचे प्रदेश सरचिटणीस रघुनाथ कुलकर्णी, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सिद्रामप्पा पाटील, ह.भ.प. लक्ष्मण महाराज चव्हाण, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे प्रदेश सरचिटणीस (आठवले) राजा सरवदे, रामचंद्र जन्नू, शिवसंग्राम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, अ‍ॅड. रजाक शेख, राजू पाटील, नगरसेवक अविनाश पाटील, अमर पुदाले, प्रा. अशोक निंबर्गी, नगरसेविका इंदिरा कुडक्याल, शोभा बनशेट्टी, विजया वड्डेपल्ली, भाजपाचे शहर सरचिटणीस विक्रम देशमुख, चंद्रकांत रमणशेट्टी, अनुजा कुलकर्णी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, शहरप्रमुख प्रताप चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते अ‍ॅड. शरद बनसोडे व त्यांच्या पत्नी वर्षा बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आ. विजयकुमार देशमुख म्हणाले की, गेल्या निवडणुकीत माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा पराभव करून आ. सिद्रामप्पा पाटील हे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. यंदा इतिहास झाला असून देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना पराभूत करून महायुतीचे अ‍ॅड. शरद बनसोडे हे निवडून आले आहेत. जिल्ह्यात ६६१ बुथपैकी ५१३ बुथवर भाजपाला आघाडी मिळाली आहे. जनतेने आमच्यावर खूप मोठा विश्वास टाकला आहे, त्याला पात्र राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असा विश्वास यावेळी आमदार देशमुख यांनी व्यक्त केला.

-----------------------------------

माजी आमदार पाटील...

लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील मनोगत व्यक्त करताना व्यासपीठावरील नावे घेत होते तेव्हा त्यांनी माजी आमदार सिद्रामप्पा पाटील असा उल्लेख केला तेव्हा लोकांमधून आवाज झाला. तेव्हा आपली चूक लक्षात येताच त्यांनी नव्हे नव्हे चुकून शब्द तोंडात आला मी त्यांना राज्याचे भावी गृहमंत्री म्हणू इच्छितो असे सांगून आपल्या भाषणातील दुरुस्ती केली.

----------------------------- .

..अन् सभा गुंडाळली

नागरी सत्कार सुरू झाला, मान्यवरांच्या भाषणाला सुरूवात झाली तेव्हा पावसाने हजेरी लावली. पाऊस मोठा झाल्याने अर्ध्यातून समारंभ गुंडाळणे भाग पडले