शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus; विवाह होता कार्यालयात, पण झाला शेतमळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 12:08 IST

कोरोनाचा परिणाम; लग्नातील गर्दी टाळण्यासाठी दोन्ही कुटुंबियांनी घेतला निर्णय

ठळक मुद्दे- मोडनिंंब येथील घटना; त्या शिक्षकांचा विवाह झाला शेतमळ्यात- मोजकेच मंडळी उपस्थित, गर्दी टाळण्यासाठी घेतला निर्णय- जिल्ह्यातील मंगल कार्यालय बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाºयांचे आदेश

मोडनिंब : विवाहाची तारीख अन् मुहूर्त ठरलेला... मंगल कार्यालयही अ‍ॅडव्हान्स देऊन बुकिंग केलेले... इतकेच नाही तर लग्नपत्रिका देऊन निमंत्रणही दिले, फोटोग्राफरसह अन्य आवश्यक त्या व्यावसायिकांना आॅर्डर देऊन अ‍ॅडव्हान्सही दिला होता. पण जिल्हाधिकाºयांचा आदेश दाखवत मंगल कार्यालय मालकाने अचानक कार्यालय कॅन्सल करून अ‍ॅडव्हान्स घेतलेली रक्कम वधूपित्यास परत केली. त्यानंतर ऐनवेळी लग्न कुठे करायचे, असा प्रश्न पडलेला असताना मंगल कार्यालयाऐवजी शेतमळ्यात अगदी साध्या पद्धतीने १८ मार्च रोजी ठरलेल्या मुहूर्तावर पार पडला.

सविस्तर वृत्त असे की, मोडनिंब येथील दिगंबर जालिंदर शिंदे यांची मुलगी सायली हिचा सांगुळ (ता़ फुलंब्रा, जि़ औरंगावात) येथील रूपचंद मारुती जाधव यांचे चिरंजीव रविराज यांच्याशी १८ मार्च दुपारी १़३४ वाजण्याच्या मुहूर्तावर मोडनिंब येथील शिवपार्वती मंगल कार्यालयात विवाह आयोजित केला होता, मात्र राज्यशासन, जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार या कार्यालयाचे मालक प्रकाश गायकवाड यांनी तत्काळ वधू-वर यांच्या नातेवाईकांना बोलावून हे कार्यालय लग्नासाठी देण्यात येणार नसल्याचे सांगितले़ त्यामुळे आता लग्न करायचे कुठे, हा प्रश्न शिंदे व जाधव कुटुंबीयांना पडला.

 अखेर वधू-वरांचे मामा व त्यांचे आईवडील यांच्या उपस्थितीत त्यांच्या मोडनिंब येथील शेतगळ्यात लग्न लावण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अतिशय साधेपणाने सायली व रविराज यांचा विवाह लावला़ सायली शिंदे व रविराज जाधव हे दोघेही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळेत शिक्षक आहेत़ धुमधडाक्यात लग्न करण्याचे नियोजन केले असतानाही त्यांनी अगदी साध्या पद्धतीने लग्न केल्याने केवळ कोरोना व्हायरसने दोन्ही कुटुंबांचे लाखो रुपये लग्नासाठी होणारा खर्च वाचला, अशी चर्चा रंगू लागली़

माझे पती रविराज यांनी व आम्हा दोघांकडील सर्व नातेवाईकांनी शासनाच्या या निर्णयाचा आदर केला़ सर्व पाहुण्यांना लग्नासाठी येऊ नका, असे निरोप पाठविले़ कार्यालयात होणारे लग्न रद्द करून तेथे होणारी गर्दी टाळण्यासाठी आम्ही आमच्या शेतमळ्यात लग्न करण्याचा निर्णय घेतला़- सायली शिंदे-जाधव, नववधू

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्नagricultureशेती