शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

बंधारे भरण्यासाठी शेतकरी आक्रमक

By admin | Updated: May 27, 2014 00:48 IST

बोगद्यातील विसर्ग २०० वरुन ९०० क्युसेक्स करण्याची मागणी

माढा : सीना-माढा बोगद्यातून केवळ २०० क्युसेक्स पाणी सोडण्यात आलेले आहे. हे पाणी सर्वदूर पोहोचू शकत नाही. त्यामुळे ९०० क्युसेक्सने पाणी सोडण्याच्या मागणीसाठी माढा व मोहोळ तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. याबाबत त्यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांकडे धाव घेतली असून, योग्य ती कार्यवाही न केल्यास रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सीना-माढा जोडकालव्यातून सोडण्यात आलेले पाणी माढा तालुक्यातील खैराव व मोहोळ तालुक्यातील बोफले बंधार्‍यापर्यंत व बंधारा भरल्यानंतर अनगर, पासलेवाडी, वाफळे, खैराव, अंजनगाव (खे.), कुंभेज, लोंढेवाडी, गोरेवाडी, मानेगाव, बुद्रुकवाडी, वाकाव, लोंढेवाडी, उपळाई खुर्द, विठ्ठलवाडी, खैरेवाडी, चव्हाणवाडी आदी गावातील नागरिकांनी केलेल्या पाईपलाईनमुळे पिकांना जीवदान मिळत आहे. जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडेही १२ मे रोजी शेतकर्‍यांनी जोडकालव्यातून पाणी सोडण्याची मागणी केली होती. मात्र त्याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे २८ मे रोजी सीना काठावरील शेतकरी अंजनगाव (खे.) येथील एस. टी. स्टॅण्डसमोर सकाळी रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे. या निवेदनावर माजी सरपंच भागवत चौगुले, माजी सरपंच चंद्रकांत व्हनमाने, बापूसाहेब वाघमोडे, समाधान पाटेकर, महादेव गोरे, दशरथ पाटेकर, बिभीषण सुतार, विजय मोहिते, राजेंद्र वाघमोडे, रवींद्र वाघमोडे, राजकुमार व्हनमाने आदींच्या सह्या आहेत.

---------------------------------------

शेतकर्‍यांचे शिष्टमंडळ

सध्या जोडकालव्यातून केवळ २०० क्युसेक्स पाणी सोडण्यात आल्याने हे पाणी या बंधार्‍यापर्यंतही पोहोचू शकत नाही. त्यामुळे ९०० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले तर त्याचा फायदा शेतकर्‍यांना व जनावरांना पिण्यासाठी होणार आहे. याबाबत या परिसरातील नागरिकांनी तहसीलदार रमेश शेंडगे यांची भेट घेऊन सोमवारी निवेदन दिले आहे.

------------------------

बेमुदत उपोषण...

माढा तालुक्यातील निमगाव (मा.) येथील बंधारा भरुन देण्याच्या मागणीसाठी पंचायत समितीचे माजी सदस्य बापूसाहेब जाधव व माजी सरपंच अशोक कदम यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर येथील सिंचन भवनसमोर तीन दिवस उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी पाणी सोडण्याचे आश्वासन देण्यात आले होते.