शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

घाई करू नका नेत्यांचा सल्ला

By admin | Updated: May 30, 2014 00:44 IST

अध्यक्षांनी घेतली भेट

सोलापूर वारणा अथवा कोयना धरणातून पाणी हवे असेल तर आलमट्टीतून भीमा नदीत पाणी सोडावे लागेल, असा प्रस्ताव महाराष्टÑ सरकारने कर्नाटक सरकारसमोर ठेवला आहे. विशेष म्हणजे या प्रस्तावाचा मसुदा सोलापुरात तयार झाला आहे. कर्नाटक सरकारने वारणा किंवा कोयना धरणातून पिण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी महाराष्टÑाकडे केली आहे. या मागणीवर चर्चा करण्यासाठी मुंबईत मंत्रालयात संबंधित खात्याच्या दोन्ही राज्यातील अधिकार्‍यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत कर्नाटकसाठी पाणी देणार असाल तर त्याच्या बदल्यात सोलापूरसाठी आलमट्टी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले पाहिजे, असा प्रस्ताव सोलापूर जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अजय दाभाडे यांनी मांडला. उजनी धरणातून दरवर्षी १८ ते २० टीएमसी पाणी भीमा नदीपात्रात सोडले जाते. महाराष्टÑ-कर्नाटक सीमेवर असलेले आठ बंधारे या पाण्याने भरले जातात. त्यातील चार बंधारे महाराष्टÑाने तर चार कर्नाटक शासनाने बांधले आहेत. सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी सोडलेल्या या पाण्याचा बहुतांश वापर शेतीसाठीच होतो. भौगोलिकदृष्ट्या कर्नाटकच्या शेतकर्‍यांना त्याचा अधिक वापर होतो. पाणी सोडताना भीमा नदीकाठचा वीजपुरवठा खंडित केल्याने महाराष्ट्रातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहतात तर कर्नाटक हद्दीतील शेतकरी मुक्तपणे या पाण्याचा लाभ घेतात, ही वस्तुस्थिती अधीक्षक अभियंता दाभाडे यांनी मांडली. दाभाडे यांनी मांडलेला प्रस्ताव कर्नाटकच्या प्रशासकीय शिष्टमंडळाने तत्त्वत: मान्य केला. दोन्ही राज्याच्या संयुक्त पथकाकडून पाहणी दौरा आयोजित करावा. त्यांच्या अहवालानंतर पाण्याच्या देवाण-घेवाणीचा नवा प्रस्ताव पुढील बैठकीत सादर करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर, सहसचिव आर. डब्ल्यू. निकुंब, पुणे विभागाचे मुख्य अभियंता अविनाश सुर्वे, उपसचिव संजय टाटू, सोलापूरचे अधीक्षक अभियंता अजय दाभाडे, सांगलीचे कार्यकारी अभियंता टी. टी. सूर्यवंशी तर कर्नाटकच्या वतीने जलसंपदा सचिव कपिल मोहन, बेळगावचे मुख्य अभियंता बी. बी. जलगसार, जलसंपदाचे कार्यकारी संचालक आर. रुद्रय्या, अनिल कुमार, आलमट्टीचे अधीक्षक अभियंता एस. एच. मुंजाप्पा आदी चर्चेत सहभागी झाले होते.

-------------------------

आव्हानाची भाषा

अध्यक्षांच्या आरोपामुळे घायाळ झालेल्या सहकारी पदाधिकार्‍यांकडून सुधारणेचा विचार येणे अपेक्षित असताना त्यांनाच आव्हान देण्याची भाषा केली जात आहे. यामुळे साहजिकच प्रशासनाला बळ मिळणार आहे. याचा फटका जि.प. चा कारभार सुधारण्याऐवजी बिघडण्यासाठी पोषक ठरणार आहे. यात राष्टÑवादी काँग्रेस व जि.प.चे नेतृत्व करणार्‍यांचेच नुकसान होणार आहे.