शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

सणासुदीच्या गर्दीत चोरांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 5:00 AM

सध्या सणा-सुदीचे दिवस असून गर्दीमध्ये रोख रक्कम उडविणारी टोळी सक्रीय असते. यासोबतच मोबाईलवर ही हात मारला जातो. मागील काही दिवसात या टोळ्या शांत होत्या. आता पुन्हा त्यांनी आपले डोके वर काढले असून बाजारातील गर्दी व घाईगडबडीचा फायदा घेतला जात आहे. मोठ्या प्रमाणात मोबाईल गहाळ व चोरीच्या तक्रारी येत आहे. अनेकांनी तर तक्रार देण्याचेही टाळले आहे. हा सणासुदीच्या काळातील चोरट्यांचा उपद्रव पोलिसांसाठी आव्हान देणारा आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील विठ्ठलवाडी भाजी बाजारात रविवार आणि गौरी-गणपतीच्या सणामुळे मोठी गर्दी जमली होती. याच संधीचा फायदा घेत मोबाईल चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. मोबाईल पडला की चोरीला गेला याचीही भनक त्यांनी अनेकांना लागू दिली नाही. शहर पोलिसांकडे मोबाईल हरविला व चोरीच्या चार तक्रारी रविवारी दाखल झाल्या. गौरीच्या सणानिमित्त प्रत्येकाच्याच घरी जेवणावळी असतात. महाप्रसादासाठी तसेच नैवैद्याकरिता विविध प्रकारच्या भाज्यांची खरेदी केली जाते. भाजी बाजारात कधी नव्हे ती त्यामुळे गर्दी झाली. त्या गर्दीचा फायदा घेण्यासाठी टपलेल्या मोबाईल चोरांनी हात साफ केले. अनेकांना आपला मोबाईल चुकून गहाळ झाला असेच वाटायला लागले. तर काहींना मोबाईल चोरी गेल्याची शंका आली. पहाटेच सण-उत्सवाच्या काळात गडबडीत असलेल्या अनेकांनी पोलीस ठाणे गाठणे टाळले. मात्र याही धावपळीत काहींनी कर्तव्य समजून शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. संतोष कळसकर रा. कृषीनगर यांनी त्यांचा १७ हजार रुपये किमतीचा मोबाईल गहाळ झाल्याची तक्रार दिली. याप्रमाणे अरुण महल्ले, गजानन सरोदे, केतन भवरे यांचेही मोबाईल गायब झाले. चोरट्यांनी गर्दीचा फायदा उचलत हात चलाखीने मोठ्या प्रमाणात मोबाईल लंपास केले. सध्या सणा-सुदीचे दिवस असून गर्दीमध्ये रोख रक्कम उडविणारी टोळी सक्रीय असते. यासोबतच मोबाईलवर ही हात मारला जातो. मागील काही दिवसात या टोळ्या शांत होत्या. आता पुन्हा त्यांनी आपले डोके वर काढले असून बाजारातील गर्दी व घाईगडबडीचा फायदा घेतला जात आहे. मोठ्या प्रमाणात मोबाईल गहाळ व चोरीच्या तक्रारी येत आहे. अनेकांनी तर तक्रार देण्याचेही टाळले आहे. हा सणासुदीच्या काळातील चोरट्यांचा उपद्रव पोलिसांसाठी आव्हान देणारा आहे. काही मिनिटात मोबाईल स्वीच ऑफ- घाईगडबीत खिशातून पडलेला मोबाईल काही मिनिटात स्वीच ऑफ होणे शक्य नाही. गर्दीत चुकून आपला मोबाईल पडला असावा असा समज झाला. मात्र सुरू असलेला मोबाईल अचानक बंद कसा पडला यावरून संशय निर्माण झाला. एकाच वेळी अनेक जण मोबाईल नसल्याची तक्रार करू लागले. यावरून भाजीबाजारात चोरट्यांनी मोबाईल लंपास केल्याचे उघड झाले आहे. आता यात पोलीस काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले.

 

टॅग्स :ThiefचोरMobileमोबाइल