शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ नगरसेवकांवर अपात्रतेची तलवार?

By admin | Updated: November 22, 2014 00:15 IST

राजकीय समीकरणे बदलणार?

रत्नागिरी : रत्नागिरी पालिका उपनगराध्यक्षपदाच्या ११ नोव्हेंबर २०१४ रोजी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीतून फुटून वेगळा गट केल्याचे सांगणाऱ्या चार नगरसेवकांनी पक्षादेशाचे उल्लंघन करून शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले. त्यांचे हे वर्तन बेकायदा असून, या चारही सदस्यांना अपात्र ठरविण्यात यावे, अशी याचिका राष्ट्रवादीचे नगरपालिकेतील पक्षप्रतोद सुदेश मयेकर यांनी आज (शुक्रवार) जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केली आहे. ही याचिका उपजिल्हाधिकारी नितीन राऊत (पुनर्वसन) यांनी स्वीकारली असून, पुढील कार्यवाहीसाठी पाठविली आहे. त्यामुळे या चारही नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. ज्या नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे, त्यामध्ये दत्तात्रय विजय साळवी, प्रीती रवींद्र सुर्वे, स्मितल सुरेश पावसकर व मुनीज तन्वीर जमादार यांचा समावेश आहे. रत्नागिरीचे उपनगराध्यक्ष असलेले राहुल पंडित यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी सेनेतर्फे संजू साळवी, तर भाजपातर्फे प्रज्ञा भिडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यासाठी ११ नोव्हेंबर २०१४ रोजी निवडणूक झाली. त्याआधी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्या आदेशानुसार रत्नागिरी पालिकेतील पक्षप्रतोद सुदेश मयेकर यांनी राष्ट्रवादीच्या पाच नगरसेवकांना ६ नोव्हेंबर २०१४ रोजी उपाध्यक्ष निवडणुकीत भाजपा उमेदवाराला मतदान करण्याचा पक्षादेश दिला होता. मात्र, एकूण सहापैकी ४ नगरसेवकांनी आपला वेगळा गट करीत ११ नोव्हेंबरच्या उपाध्यक्ष निवडणुकीत सेनेच्या संजू साळवी यांना मतदान करून पक्षादेशाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ चे कलम ३ व ५ व त्याखालील नियमानुसार ही याचिका दाखल करण्यात आली आहे. हा याचिका अर्ज मयेकर यांनी त्यांचे वकील भाऊ शेट्ये तसेच राष्ट्रवादीचे नेते बशीर मुर्तुझा व अन्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उपजिल्हाधिकारी राऊत यांच्याकडे दाखल केला आहे. (प्रतिनिधी)राजकीय समीकरणे बदलणार?नगरपालिकेत सध्या सेनेचे १३ व राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट केलेले ४ असे सेनेसोबतचे एकूण १७ सदस्य आहेत. तर भाजपाचे ८, राष्ट्रवादीचे २ व कॉँग्रेसचा एक असे ११ सदस्य भाजपकडे आहेत. भाजपाचे नगराध्यक्ष पालिकेत विराजमान आहेत. या स्थितीत चार सदस्यांचा वेगळा गट अपात्र ठरला तर चार जागा रिक्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सेनेचे संख्याबळ १३ होईल. त्याचबरोबर सेनेतील २ नगरसेवक राजीनामा देण्याची शक्यताही आहे. असे राजकीय समीकरण जुळले तर सेना व भाजपा पालिकेत प्रत्येकी ११ या संख्याबळावर येऊ शकते. मात्र, प्रत्यक्षात निर्णय काय होतो, काय घडते यावरच पुढील समीकरणे अवलंबून आहेत.