शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खारे पाणी शेतीत घुसले

By admin | Updated: December 28, 2014 00:11 IST

पाल-गोडवणेवाडीतील शेतकऱ्यांचे नुकसान

वेंगुर्ले : पाल-गोडवणेवाडी येथील खारलॅण्ड बंधाऱ्याच्या मोरीला फळ्या नसल्यामुळे खारे पाणी शेतीत घुसून सुमारे १५ ते २० एकर वायंगणी भातशेती, पाच एकर माड बागायतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पिण्याचे पाणीही खराब झाले आहे. याबाबत वेळोवेळी संंबंधित विभागास लेखी तक्रारी करूनही कोणतीच कारवाई न केल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याची प्रत्यक्ष पाहणी करून ढासळलेले बंधारे व मोऱ्यांची डागडुजी करावी, अशी मागणी खारलॅण्ड उपविभाग वेंगुर्ले यांच्याकडे पाल ग्रामपंचायतीने ठराव करून केली आहे. पाल-गोडवणेवाडी येथून मोचेमाड खाडी जात असून खारे पाणी शेत जमिनीत व माड बागायतीत येऊ नये, यासाठी शासनाच्या खारलॅण्ड विभागाने तुळस ते आसोली हद्दीपर्यंत धूपप्रतिबंधक बंधारे व ठिकठिकाणी मोऱ्या बांधल्या आहेत. या बंधाऱ्यांना सुमारे २५ वर्षे उलटून गेली असून याकडे गेल्या पंचवीस वर्षात खारलॅण्ड विभागाने देखभाल दुरुस्तीची कामेच केली नाहीत. त्यामुळे नदीकडेने असलेले बंधारे ढासळल्याने तसेच मोरी लिकेज झाल्याने खारे पाणी भातशेतीत, माड बागायतीत घुसून शेती व बागायती नापीक झाली आहे. यामुळे स्थानिक लोकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून जवळील पिण्याचे पाणीही खराब झाले आहे. धूपप्रतिबंधक बंधाऱ्याची दुरुस्ती व्हावी, यासाठी येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीमध्ये ठराव करून वेळोवेळी लेखी निवेदनेही दिली होती. परंतु याकडे खारलॅण्ड विभागाने दुर्लक्ष केल्याने स्थानिक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्वरीत डागडुजी करावी, अशी मागणी ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्यावतीने वेंगुर्ले खारलॅण्ड उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे. यावेळी पाल-गोडवणेवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)