शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

विना‘तारण’ कर्ज द्या; पण विना‘कारण’ नको !

By admin | Updated: August 10, 2015 20:36 IST

सतीश सावंत : वैभववाडी ग्रामीण पतसंस्थेच्यावतीने सत्कार

वैभववाडी : विनाकारण दिलेले कर्ज बुडण्याची शक्यता अधिक असून अशी कर्ज मागणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सहकार कायद्यातील बदल स्वीकारून पतसंस्था टिकवायच्या असतील तर एकवेळ विना‘तारण’ कर्ज द्या; पण विना‘कारण’ नको, असा सल्ला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी आज येथे वैभववाडी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात दिला.येथील सुवर्णा मंगल कार्यालयात वैभववाडी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा झाली. यावेळी सतीश सावंत यांचा पतसंस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला. सभेला पतसंस्थेचे अध्यक्ष शांताराम रावराणे, दत्ताराम साटम, सज्जन रावराणे शाळिग्राम रावराणे, संदीप पाटील, दिगंबर सावंत, संजय रावराणे, मनोज सावंत, सुधीर खांबल आदी उपस्थित होते.सावंत पुढे म्हणाले, पतसंस्था काढणे सोपे आहे. पण त्या चालविणे कठीण काम आहे. अशावेळी उतारवयातील लोकांनी २७ वर्षे पतसंस्था चालवून नवा आदर्श निर्माण केला आहे. यातून पतसंस्थेने ठेवीदारांचा विश्वास आणि हित जपले आहे. हे सिध्द होते.संस्थेला नफा किती मिळाला. आॅडिट वर्ग काय मिळाला, यापेक्षा संस्थेने किती बेरोजगारांनाधंदा, व्यवसायात उभं केले हे महत्त्वाचे आहे. सहकार कायद्यातील बदलामुळे पतसंस्था चालवणे कठीण झाले आहे.पतसंस्था या जिल्हा बँकेच्या मालक आहेत. जिल्हा बँक राष्ट्रीयीकृत बँकांच्या बरोबरीने सेवा सुविधा देत आहे. त्यामुळे पतसंस्थांच्या ठेवी अन्य बँकांकडे जात असतील तर ते योग्य नाही. जिल्हा बँकेचा उत्कर्ष पतसंस्थांच्या हातात आहे. त्यामुळे पतसंस्था आणि बँक एकत्र येऊन सहकार चळवळ वृध्दींगत करुया, असे आवाहन सावंत यांनी केले. तसेच २७ वर्षे पूर्ण झालेल्या वैभववाडी ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या सत्काराने माझा सन्मान वाढविला असे मत त्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)क्रेडिट कार्ड सुविधा लवकरचसिंधुदुर्ग बँक ही २९ एटीएम केंद्र असणारी एकमेव सहकारी जिल्हा बँक आहे. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांना जिल्ह्याबाहेर कुठेही खरेदीसाठी जाताना प्रवासात पैसे सांभाळण्याची कटकट नको म्हणून सिंधुदुर्ग बँक लवकरच आपल्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड सुविधा उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली.