शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

निवड चाळीसची प्रत्यक्ष मात्र बाराच हजर !

By admin | Updated: May 1, 2015 00:17 IST

बारा सरपंचांच्या उपस्थितीत सरपंच समितीची बैठक : समितीच्या अध्यक्षांनी व्यक्त केले अनुपस्थितीबाबत आश्चर्य

कऱ्हाड : गावातील अपूर्ण कामांबाबत, पिण्याच्या पाण्याच्या उद्भवणाऱ्या समस्यांबाबत विकास करता यावा म्हणून कऱ्हाड विकास गटांतर्गत २०१५-१६ च्या सरपंच समितीसाठी चाळीस गावांची निवड एक वर्षासाठी करण्यात आली. या सरपंच समितीच्या बोलावण्यात आलेल्या बैठकीस केवळ बाराच सरपंचांनी उपस्थिती लावल्यामुळे समितीच्या अध्यक्षांनीही सरपंचांच्या अनुपस्थितीबाबत आश्चर्य व्यक्त केले. या समितीचे महत्त्व तसेच गावातील अडचणी व समस्यांबाबत गांभीर्य नसलेल्या सरपंचाकडून उपस्थिती लावली न गेल्याने ही समिती कशासाठी स्थापन करण्यात आली आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. २०१५ - १६ या वर्षासाठी पंचायत समिती स्थरावर सरपंच समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीसाठी लोकसंख्येच्या निकषानुसार चाळीस गावांची निवड करण्यात आली आहे. त्या गावातील सरपंचांनी आपल्या गावातील प्रश्न, अडचणी तसेच शासकीय कामाविषयी समस्या याविषयी महिन्यातून एकदा घेण्यात येणाऱ्या सरपंच समितीच्या बैठकीत मांडणे गरजेचे असणार आहे.समितीची बैठक गुरुवारी कऱ्हाड येथे पंचायत समितीमध्ये पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कऱ्हाड पंचायत समितीचे उपसभापती विठ्ठलराव जाधव होते. तसेच सचिव जयवंत दळवी यांची उपस्थिती होती. लोकसंख्येच्या निकषानुसार निवडण्यात गावांमध्ये शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना तसेच कामांबाबत उदासीनतेमुळे की काय या बैठकीस बाराच गावांतील सरपंचांनी उपस्थिती लावली.सरपंच समितीच्या बैठकीवेळी उपस्थिती लावलेल्या बारा गावांच्या सरपंचांना शासनाच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांनी आपल्या विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांबाबत माहिती दिली. तसेच बैठकीस उपस्थिती लावलेल्या सरपंचांनी आपल्या गावातील पाण्यांच्या, अतिक्रमाणाच्या तसेच ग्रामपंचायतींच्या करवसुलीविषयी उद्भवणाऱ्या समस्यांबाबत अधिकाऱ्यांपुढे मांडल्या. गावच्या सुधारणा, पाणीटंचाई आदी गोष्टींविषयी गावचा कारभार चालवणाऱ्या सरपंचांना गावाविषयी किती काळजी आहे हे यावरून दिसून आले. (प्रतिनिधी) चाळीस गावांची निवड २०१५- १६ या वर्षासाठी लोकसंख्येच्या निक षानुसार चाळीस गावांची निवड करण्यात आली आहे, त्यातून सरपंच समिती तयार करण्यात आली आहे. या सरपंच समितीचे तिसरे वर्ष असून, यंदाच्या वर्षी राजमाची, नारायणवाडी, बाबरमाची, खुबी, कापिल, गोंदी, किरपे, आणे, घारेवाडी, अबईचीवाडी, वस्ती साकुर्डी, पोतले, कुसूर, वसंतगड, येणके, म्होप्रे, केसे, साजूर, गोटेवाडी, मालखेड, शेवाळेवाडी, जिंती, येणपे, टाळगाव, नांदगाव, म्हासोली, संजयनगर, कालेटेक, जुने कवठे, हणबरवाडी, खराडे, रिसवड, पाडळी, शहापूर, वराडे, हिंगनोळे, तासवडे, अंधारवाडी, शिरगाव, शिवडे या गावांचा समावेश सरपंच समितीमध्ये करण्यात आला आहे.कसे चालते सरपंच समितीचे कामकाज महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या तरतुदीनुसार सरपंच समितीचे कार्य पाहिले जाते. त्यातून पंचायत समितीने पार पाडावयाच्या ग्रामपंचायतींच्या नियंत्रणविषयक व पर्यावरणविषयक कामांच्या संबंधित सर्व बाबींवर पंचायत समिती सल्ला देते. पंचायत समिती सरपंच समितीकडून देण्यात आलेल्या सल्ल्यावर विचार करून अंमलबजावणी करते.