शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेच्या नफ्यात विक्रमी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:39 IST

सातारा : सर्वच क्षेत्रांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अधिक प्रमाणात करावा लागणार आहे. बँकेच्या भागभांडवल, ठेवी, कर्ज, सुयोग्य गुंतवणूक व ...

सातारा : सर्वच क्षेत्रांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अधिक प्रमाणात करावा लागणार आहे. बँकेच्या भागभांडवल, ठेवी, कर्ज, सुयोग्य गुंतवणूक व कर्ज वसुली आदींमध्ये झालेली वाढ यामुळे बँकेला अहवाल वर्षात विक्रमी नफा झालेला आहे, अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ज्येष्ठ संचालक रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ७० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, उपाध्यक्ष सुनील माने, संचालक आमदार शशिकांत शिंदे, खासदार उदयनराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व इतर अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

रामराजे म्हणाले, बँक स्थापनेपासून सतत नफ्यात आहे व ऑडिट अ वर्गात आहे. बँकेने सहकारी बँकिंग क्षेत्रात चांगला नावलौकिक मिळविला आहे. सध्या आयटीचे युग असल्याने बँकेने ग्राहकांना आधुनिक बँकिंगच्या सर्व प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या बँकेमध्ये भविष्यात अधिक प्रमाणात आधुनिकीकरणाचा वापर करून ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न केला जाईल. सभासद, मतदार जागृत होत आहेत त्यामुळे चांगले बदल होत आहेत. बँक आपणास सक्षम ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.

राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सभा ऑनलाइन होत असून सभासदांनी या सभेत अनेक प्रश्न विचारलेले आहेत. त्याचा बँकेचे संचालक मंडळ जरुर विचार करील. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणे अपेक्षित असून थांबलेले अर्थचक्र पुन्हा सुरळीत सुरू होणे आवश्यक आहे. आपली बँक राज्यातच नव्हे, तर देशातच नावलौकिक प्राप्त बँक आहे.

या सभेला संचालक दत्तात्रय ढमाळ, शिवरूपराजे खर्डेकर, राजेश पाटील-वाठारकर, अनिल देसाई, प्रकाश बडेकर, प्रदीप विधाते, अर्जुनराव खाडे, सुरेखा पाटील, कांचन साळुंखे, जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर आदी ऑनलाइन उपस्थित होते.

बँकेला ४६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा : शिवेंद्रसिंहराजे

अहवाल सालात बँकेकडे रुपये ७ हजार ६२२ कोटी २८ लाखांच्या ठेवी असून एकूण कर्ज वितरण रुपये ५ हजार २४५ कोटी १७ लाख आहे. बँकेचा एकूण व्यवसाय १२ हजार ८६७ कोटी ४५ लाख आहे. सन २०१९-२० या सालामध्ये बँकेस करपूर्व नफा रुपये ८५ कोटी ३१ लाख झालेला असून सर्व तरतुदीनंतर रुपये ४६ कोटी निव्वळ नफा झालेला आहे.

फोटो ओळ : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शनिवारी झालेल्या वार्षिक सभेत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी मार्गदर्शन केले.