शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

हवामान बदलामुळे कांदा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:18 IST

कुकुडवाड : आठवडाभरापासून धुके, ढगाळ वातावरणामुळे माण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. मागील आठवड्यापासून कधी धुके, तर ...

कुकुडवाड : आठवडाभरापासून धुके, ढगाळ वातावरणामुळे माण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. मागील आठवड्यापासून कधी धुके, तर कधी थंडीचा तडाखा यामुळे पडणारे दवबिंदू यामुळे कांद्याच्या लहान रोपांवर करपा रोग तसेच मर रोगांमुळे कांदा पातळ झाला आहे. कांद्याच्या पातीवर पांढरे डाग पडत आहेत. महागडी औषधे वापरूनही काही फरक पडत नाही.

मागील काही महिन्यांपासून कांद्याचा बाजार वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अशा पल्लवित झाल्या आहेत. कांद्याला चांगला दर मिळाला तर कर्जाचा डोंगर कमी होईल, या आशेने शेतकरी कांद्याकडे लक्ष देत आहेत; पण वातावरण साथ देत नसल्याने शेतकरी वैतागले आहेत.

गेल्या महिन्यात वातावरण निवळत असल्याचे जाणवत होते; पण सध्या अचानक धुक्यासह ढगाळ वातावरणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. हे पाहता गतवर्षीप्रमाणे थंडी अपेक्षित असते; पण काहीच थंडी नाही. यामुळे हरबरा, ज्वारी, कांदा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकरी महागडी औषध फवारणी करताना दिसत आहे. मात्र, त्याचा परिणाम होताना दिसत नाही. नववर्षाच्या सुरुवातीच्या दिवसापासून वातावरणात चढ-उतार होताना दिसले. कधी चक्रीवादळाचा तडाखा, कधी कमी दाबाचा पट्टा, तर कधी अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतित आहे.

गेल्या दोन वर्षांपूर्वी दुष्काळाचा सामना केला तर यंदा अवकाळी पावसाचा सामना केला. शेतकऱ्यांना दोन पैसे मिळायला लागले तोपर्यंत पाऊस म्हणतो ‘मी पुन्हा येईन’ त्यामुळे उत्पादनावर परिणाम होणार आहे. ज्यांच्याकडे कांदा साठवायला सोय आहे, त्यांना दोन पैसे मिळाले. यंदा कांदा लागवडीस सुरुवात केली; पण ऑक्टोबरमधील परतीच्या पावसाने तो पूर्णपणे सडून गेला. शेतकऱ्यांनी लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला; पण होत्याचं नव्हतं झालं. केलेला खर्च पूर्णपणे वाया जाऊन लाखो रुपयांचा फटका बसला.

चौकट..

शेतकरी चांगलाच हतबल...

शेतकरी रोपे आणून कांद्याची लागवड करत आहे; पण रोगाने रोपेसुद्धा पिवळी पडत आहेत. कांद्याची पात ही पिवळी पडत असल्याने शेतकरी चांगलाच हतबल झाला आहे. या दिवसांत पिकांना थंडी पोषक आले, मात्र गेल्या काही दिवसांपासून गारवानंतर ढगाळ वातावरण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेती कोरडी होत नसल्याने तणाचा प्रादुर्भाव तर ऊन नसल्याने पिकाला पोषक वातावरण नाही. सगळीकडे शेतात तणाचा भरणा दिसत आहे म्हणून शेतकरी वैतागला आहे. आज तरी शेतकरी हवामान बदलाची वाट पाहत आहे.

२९कुकुडवाड

माण तालुक्यात कांदा पिकावर करपा आणि मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतित आहे.