शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

राजधानीत विरोधकांचे खेळ... राजेंचा बसणार का मेळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:42 IST

असे असू शकते संभाव्य चित्र दोन्ही राजे ‘भाजप’वासी झाले तरी पालिकेची निवडणूक ते स्वतंत्र आघाड्या करून लढण्याचीच अधिक शक्यता ...

असे असू शकते संभाव्य चित्र

दोन्ही राजे ‘भाजप’वासी झाले तरी पालिकेची निवडणूक ते स्वतंत्र आघाड्या करून लढण्याचीच अधिक शक्यता आहे. कारण गेल्या निवडणुकीत झालेल्या पराभवाची सल अजूनही आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मनात असू शकते. त्यामुळेच सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची ते एकही संधी सोडत नाहीत. दुसरीकडे खा. उदयनराजे यांचा भाजप प्रवेश त्यांच्या काही शिलेदारांच्या पचनी पडलेला नाही. असे शिलेदार वेगळी वाट शोधण्याचा धोकाही आहे. खा. उदयनराजेंमुळे कोरेगाव मतदारसंघात आ. शशिकांत शिंदेंना विधानसभेला मोठा हादरा बसला. त्याचा वचपा म्हणून शशिकांत शिंदे यांनीदेखील पालिकेत राष्ट्रवादीचे पॅनेल उभे करण्याची घोषणा केली आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्ये असले तरी त्यांची आजही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जवळीक आहे. त्यामुळे खासदारांच्या गडाला खिंडार पाडण्यासाठी यंदा मोठी राजकीय उलथापालथ होऊ शकते. मात्र, खा. उदयनराजे भोसले हे फासा पलटण्यात तितकेच माहीर आहेत, हेदेखील विसरून चालणार नाही.

(चौकट)

असे होते पक्षीय बलाबल

एकूण प्रभाग २०

एकूण नगरसेवक : ४०

सातारा विकास आघाडी : २२

नगर विकास आघाडी : १२

भारतीय जनता पार्टी : ६

(चौकट)

हद्दवाढीमुळे असा असेल बदल

द्विसदस्यीय प्रभाग पद्धती रद्द

यंदा एक वार्ड एक नगरसेवक

एकूण वार्ड ४८

एकूण नगरसेवक ४८

हद्दवाढीमुळे वाढलेली लोकसंख्या ६१ हजार

(चौकट)

राजकीय समीकरण बदलले...

पालिकेच्या गेल्या निवडणुकीत खा. उदयनराजेंच्या आघाडीने सत्ता स्थापन केली, तर भाजपच्या सहा नगरसेवकांनीदेखील प्रथमच पालिकेचा उंबरठा ओलांडला. आताची परिस्थिती वेगळी आहे. दोन्ही राजे भाजपमध्ये असले तरी पालिकेची निवडणूक एकत्र येऊन व पक्षाच्या चिन्हावर लढविली जाईल, अशी शक्यता धूसर आहे. येत्या दोन-तीन महिन्यात बरीच राजकीय समीकरणे बदलणार असून, दोन्ही राजेंमध्ये सुरू असलेली पत्रकबाजी याचीच सुरुवात असल्याची चर्चा आहे.

(चौकट)

वचननामा पूर्तीसाठी पुरेपूर प्रयत्न

सत्ताधारी सातारा विकास आघाडीने गेल्या निवडणुकीत जनतेला दिलेला वचननामा पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. कास धरणाची उंची, ग्रेड सेपरेटर, भुयारी गटार योजना, घरकुल योजना, रस्ते विकास, पाणी योजनांचे बळकटीकरण, दिवाबत्ती यापैकी अनेक योजनांची कामे मार्गी लावली, तर काही योजना प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीला सामोरे जाताना सत्ताधाऱ्यांना हा ‘वचननामा’ कितपत लाभदायी ठरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.