शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शहरात राहणाऱ्या शेतकऱ्यांचे हातपाय लॉकडाऊन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : शहरात राहून आठवड्यातून एक-दोन वेळा गावी जाऊन शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संचारबंदी आदेशामुळे गोची झाली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : शहरात राहून आठवड्यातून एक-दोन वेळा गावी जाऊन शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संचारबंदी आदेशामुळे गोची झाली आहे. शेतकऱ्याकडे कोणतेही ओळखपत्र नसल्याने पोलिसांनादेखील काय कारण दाखवायचे, हा त्यांच्यापुढे यक्षप्रश्न असून लॉकडाऊनमध्ये त्यांचे हात-पाय बांधून पडले आहेत.

कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये संचारबंदी आदेश लागू केले आहेत. मात्र शेतीच्या अनुषंगाने करावी लागणारी कामे सुरू ठेवावी तसेच खते बी-बियाणे यांची दुकानेदेखील उघडी ठेवावीत, असे या आदेशात नमूद आहे. त्यामुळे बी-बियाणे खरेदीसाठी आलेले शेतकरी तसेच शेतात काम करायला जाण्यासाठी निघालेले शेतकरी यांना जाऊ द्यावे, असे संकेत आहेत.

सध्या शेतकऱ्यांची खरीप हंगामाची गडबड सुरू आहे. पाऊस पडण्याच्या आधी मशागतीची कामे उरकून घेतली म्हणजे पेरायला मोकळं, अशी शेतकऱ्यांची धारणा असते. संचारबंदी आदेशामुळे या लगबगीला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे. सातारा, कऱ्हाड, वाई, फलटण या शहरांचे नागरीकरण मोठ्या प्रमाणावर झालेले आहे. शहरांच्या आजूबाजूच्या ३० किलोमीटर परिघातील शेतकरी मुलांचे शिक्षण, नोकरी, व्यवसाय यांच्या निमित्ताने शहरात स्थायिक झालेले आहेत. आठवड्यातून एक-दोनदा गावी जाऊन शेतातील कामे करण्याची त्यांची पद्धत आहे, मात्र सध्याच्या घडीला त्यांना गावी जाता येत नाही.

दरम्यान, शेतकऱ्यांना गावी सोडायला कोणतीही हरकत नाही; परंतु शेतकऱ्यांच्या आडून काही अपप्रवृत्ती मोकाट फिरू लागतील आणि त्यातून कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढेल, अशी प्रशासनाला भीती आहे. या परिस्थितीमध्ये गावचा भाऊ, चुलता, भावकीतील एखादी व्यक्ती यांच्या माध्यमातून लोक शेतातली कामे करून घेत आहेत.

वारंगुळ्याला पुन्हा झळाळी...

जिल्ह्यात पूर्वीपासून शेतामध्ये वारंगुळा ही पद्धत आहे. पूर्णवेळ शेती करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये अजूनदेखील ही पद्धत सुरू आहे; परंतु जे शेतकरी इतर नोकरी-व्यवसाय करून शेती बघतात, त्यांच्यामधील ही सवय मोडली. आता कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे लोकांना भरपूर वेळ आहे. उद्योगधंदे बंद आहेत, या व्यवसायातील लोक आता वारंगुळा पद्धतीने पुन्हा काम करताना पाहायला मिळत आहेत.

कोट..

सातारा शहरात नोकरी-व्यवसाय तसेच मुलांच्या शिक्षणानिमित्त आजूबाजूच्या गावांमधील लोक राहतात. दोन-तीन दिवसांतून एकदा गावी जाऊन शेतातील कामेदेखील करतात. या शेतकऱ्यांना अडवले जात असल्याने खरीप हंगाम कसा पार पाडायचा, हा प्रश्न त्यांना पडलेला आहे.

- अमर करंजे

कोट...

गावामध्ये एकमेकांना मदत करण्याची लोकांमध्ये उपजतच भावना असते. त्यामुळे शहरात राहणारा शेतकरी गावी जाऊ शकला नाही तरी पेरणीची कामे लोकांच्या माध्यमातून होतील; परंतु जो शेतकरी गावातून शहरांमध्ये बी-बियाणे, खते खरेदी करण्यासाठी येणार आहे, त्याला रोखले जाऊ नये.

- बाळासाहेब गोसावी

फोटो ओळ : सातारा शहराच्या आजूबाजूच्या गावांमध्ये स्थानिक शेतकरी खरीप हंगामाच्या कामात गुंतलेले आहेत. सातारा शहराजवळील अंबेदरे परिसरात शेतकऱ्यांची चाललेली लगबग. (छाया : सुनील जाधव)