शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडला ८७ ग्रामपंचायतींसाठी अटीतटीचा सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:32 IST

तालुक्यातील १०४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या मुदतीअखेर १२ ग्रामपंचायतींनी बिनविरोधचा झेंडा फडकविला. तर पाच ...

तालुक्यातील १०४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या मुदतीअखेर १२ ग्रामपंचायतींनी बिनविरोधचा झेंडा फडकविला. तर पाच ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्या. मात्र, ८७ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी चुरशीने मतदान होत आहे.

काँग्रेसचे नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण व अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्यात मनोमिलन झाले आहे. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वच गावात दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांच्यात मनोमिलन झाल्याचे पहायला मिळत नाही. स्थानिक कार्यकर्त्यांनी सोयीच्या आघाड्या केल्याचे दिसते.

कऱ्हाड दक्षिणमध्ये भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांच्या समर्थकांच्या विरोधात प्रामुख्याने उदयसिंह पाटील समर्थक रिंगणात दिसतात. तर पृथ्वीराज चव्हाण समर्थक काही गावात भोसलेंसोबत तर काही ठिकाणी उंडाळकरांच्यासोबत दिसतात. उत्तर विधानसभा मतदार संघातील गावात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा बऱ्याच प्रमाणात वरचष्मा दिसत आहे. अनेक गावात राष्ट्रवादी विरूद्ध काँग्रेस असा सामना पहायला मिळतोय. काही गावात मंत्री पाटील यांच्या पॅनेलच्या विरोधात सर्व विरोधक एकवटल्याचे चित्र आहे.

इंदोली, उंब्रज, ओंड, कालवडे, पाल, काले आदी मोठ्या गावातील निवडणुका जोरदार होताना दिसतात. सर्वच ग्रामपंचायत निवडणुकीत वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घातले आहे. त्यामुळे स्थानिक नेत्यांबरोबर वरिष्ठ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. आता मात्र कोण बाजी मारणार, हे १८ जानेवारी नंतरच कळणार हे नक्की.

- चौकट

... या ग्रामपंचायतींनी फडकावला बिनविरोधचा झेंडा

तालुक्यातील उंडाळे, कामथी, किरपे, गोटे, टाळगाव, भुरभुशी, म्हारुगडेवाडी, येणके, वसंतगड, विरवडे, संजयनगर, हणबरवाडी या १२ ग्रामपंचायतींनी एकीचे बळ दाखविले. निवडणुकीत वैर निर्माण न करता येथील ग्रामस्थांनी बिनविरोधचा डंका वाजविला.

- चौकट

अपुरे पडले प्रयत्न

अंबवडे, खोडजाईवाडी, पाचुंद, लटकेवाडी, वाघेश्वर येथील ग्रामस्थांनीही बिनविरोध ग्रामपंचायतीसाठी प्रयत्न केले. मात्र, त्यांचे प्रयत्न थोडेसे कमी पडले. त्यामुळे या ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्या.

.......................................