शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ओढ्यावरील अतिक्रमणामुळे जखिणवाडी रस्ता तीन दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:14 IST

मलकापूर : महामार्ग ते जखिणवाडी जाणाऱ्या रस्त्यावर पुराचे पाणी वाहत असल्यामुळे तीन दिवस बंद होता. काही दिवसांपूर्वी पडलेल्या संततधार ...

मलकापूर : महामार्ग ते जखिणवाडी जाणाऱ्या रस्त्यावर पुराचे पाणी वाहत असल्यामुळे तीन दिवस बंद होता. काही दिवसांपूर्वी पडलेल्या संततधार पावसामुळे या ओढ्याचे पाणी तीन फुटांनी रस्त्यावरून वाहू लागल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांसह प्रवाशांचे हाल झाले. या रस्त्याकडेने जाणाऱ्या ओढ्यावर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे ओढ्याचा प्रवाह बदलून नेहमीच रस्त्यावरून पाणी वाहत आहे. प्रशासनाने लक्ष घालून या ओढ्यावरील अतिक्रमण काढावे, अशी मागणी शेतकऱ्यांसह ग्रामस्थ करत आहेत.

महामार्गावरून जखिणवाडीसह आगाशिव डोंगर व ऐतिहासिक लेण्यांकडे जाण्यासाठी मळाईदेवी पतसंस्था ते जखिणवाडी हा जवळचा रस्ता आहे. इतर गावांमधून येणाऱ्या पर्यटकांसह या भागातील शेतकऱ्यांना सोयीस्कर अशा या रस्त्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी जमीन देऊन डांबरीकरणही केले आहे. याच रस्त्यालगत आगाशिव डोंगरावरून येणारे पाणी वाहून जाण्यासाठी नैसर्गिक ओढा आहे. या ओढ्यावर काही ठिकाणी अतिक्रमण झाले होते. यापूर्वी शेतकऱ्यांची सोय व पर्यटनाला चालना देण्यासाठी यापूर्वीच्या सरपंचांसह सदस्यांनी काही अतिक्रमणे काढून रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण केले आहे. मात्र काही मोजक्याच शेतकऱ्यांनी ओढ्यावरच अतिक्रमण करत आडमुठे धोरण स्वीकारल्यामुळे ओढ्याचा प्रवाह बदलून रस्त्यालाच ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

गेल्या आठवड्यात संततधार पावसाने हजेरी लावली. सलग तीन दिवस पडत असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसाचा जोर वाढतच गेला. त्यामुळे सर्वत्र पाणीचपाणी झाले होते. सलग पडत असलेल्या पावसाने या ओढ्यालाही पूर आला होता. पुराचे पाणी तीन फुटाने रस्त्यावरून वाहत असल्यमुळे तीन दिवस हा रस्ता वाहतुकीस बंद केला होता. काही शेतकऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे या ओढ्याचा प्रवाह बदलून नेहमीच रस्त्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे पर्यटकांसह शेतकरी व ग्रामस्थांना हकनाक त्रास होत आहे. प्रशासनाने लक्ष घालून या ओढ्यावरील अतिक्रमण काढावे, अशी मागणी शेतकऱ्यांसह ग्रामस्थ करत आहेत.

चौकट

एक किलोमीटरसाठी सहा किलोमीटर प्रवास

महामार्गावरून जखिणवाडीला जाणाऱ्यांसाठी या रस्त्याने साधारणतः केवळ एक किलोमीटर अंतरात पोहोचते. मात्र या रस्त्यावरून पाणी वाहत असल्यामुळे कसरत करत प्रवास करण्यापेक्षा कृष्णा रुग्णालयाकडून किंवा नांदलापुरातून सहा किलोमीटर लांबून प्रवास करावा लागत आहे.

चौकट

अर्जावर अर्ज......पण हात रिकामेच

या ओढ्यावर अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांचे अतिक्रमण काढण्यासाठी इतर शेतकऱ्यांसह ग्रामपंचायत प्रशासनाने तहसीलदारांसह शासन दरबारी अनेकवेळा अर्जावर अर्ज केले आहेत. मात्र प्रत्येकवेळी संबंधित अधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी केवळ आश्वासनच दिले आहे. या मुसळधार पावसाने झालेल्या हाहाकाराने तर यांचे डोळे उघडणार का? असा सवाल ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

फोटो ०१मलकापूर

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग ते जखिणवाडी रस्त्याकडेने जाणाऱ्या ओढ्यावर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे ओढ्याचा प्रवाह बदलून नेहमीच रस्त्यावरून पाणी वाहत आहे. यामुळे पर्यटकांसह शेतकरी व ग्रामस्थांना हकनाक त्रास होत आहे. (छाया : माणिक डोंगरे)

010821\img_20210724_131436.jpg

फोटो कॕप्शन

महामार्ग ते जखिणवाडी रस्त्याकडेने जाणाऱ्या ओढ्यावर कांही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे ओढ्याचा प्रवाह बदलून नेहमीच रस्त्यावरून पाणी वाहत असल्यमुळे पर्यटकांसह शेतकरी व ग्रामस्थांना हकनाक त्रास होत आहे. (छाया-माणिक डोंगरे)