शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

सलग क्षेत्राच्या भूसंपादनातून होणार औद्योगिक विस्तार ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:18 IST

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील औद्योगिक वसाहतीच्या तिसऱ्या टप्प्यातील जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, संमतीधारक शेतकऱ्यांचे सलग क्षेत्र ...

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील औद्योगिक वसाहतीच्या तिसऱ्या टप्प्यातील जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, संमतीधारक शेतकऱ्यांचे सलग क्षेत्र अधिग्रहित करून त्याचा मोबदला त्वरित वाटप करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे एकीकडे या टप्प्यातील जमिनीवरील शिक्के उठविले असले तरी उर्वरित क्षेत्रांत औद्योगिकीकरणाचा विस्तार होणार आहे.

औद्योगिक वसाहतीच्या तिसऱ्या टप्प्यातील जमीन संपादनासाठी खंडाळा तहसील कार्यालयात संबंधित शेतकऱ्यांसमवेत एक बैठक घेण्यात आली. यावेळी एमआयडीसीचे कोल्हापूर विभागीय अधिकारी धनाजी इंगळे, उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

तालुक्यातील मोर्वे, भादे, अहिरे, बावडा, म्हावशी, खंडाळा या गावांमधील शेतजमीन एमआयडीसी टप्पा क्रमांक ३ साठी औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केले होते. त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही सुरू होती. मात्र, तालुक्यातील शेतकऱ्यांचा या गोष्टींसाठी सातत्याने विरोध होता. त्यामुळे काही गावांतील क्षेत्र वगळण्यात आले आहे. मात्र, शिवाजीनगर, भादे येथील ज्या शेतकऱ्यांची संमती आहे त्यांचे क्षेत्र घेण्याबाबत शासनपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

या ठिकाणी संपादित करण्यात येणाऱ्या क्षेत्रातील एकाच गटातील आणेवारी निश्चित नाही तरीही एमआयडीसीला व्यवहार केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत, असा आक्षेप शेतकऱ्यांनी घेतला. त्यासाठी आणेवारी दुरूस्ती करूनच मोबदला अदा केला जाईल, असे स्पष्ट केले. त्याचबरोबर ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी बागायत केले आहे, त्या क्षेत्राऐवजी बदली जमीन मिळावी, अशी मागणी केली. याबाबत संबंधित खातेदारांनी बदली क्षेत्र निदर्शनास आणून दिले तर त्यात सहकार्य केले जाईल. औद्योगिक वसाहतीला आवश्यक सलग क्षेत्र मिळविण्यासाठी भूसंपादन मंडळाचे प्रयत्न सुरू असून, ज्या क्रमाने गटाचे संपादन होईल त्यानुसार भूसंपादित जमिनीचा मोबदला वाटप करण्यात येणार आहे. या बाबतीत शेतकऱ्यांच्या अन्य काही अडचणी असतील तर त्या मांडा त्यावर मार्ग काढून संपादन प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.

............................................

२८खंडाळा

फोटो : एमआयडीसीबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधताना भूसंपादन मंडळाचे अधिकारी.