शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

पंचनामे करून शासनाकडे प्रस्ताव त्वरित सादर करा : मकरंद पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 5:10 PM

महाबळेश्वर , वाई, खंडाळा तालुक्यांत अतिवृष्टीने आलेल्या पुरात सर्वसामान्यांची घरे, शेती, विहिरी, पिके, जनावरे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले. त्यांचे लवकरात लवकर पंचनामे करून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावेत. नुकसानग्रस्तांपर्यंत जास्तीत जास्त शासकीय मदत पोहोचवून त्यांच्या दु:खावर फुंकर घालण्याचे काम सर्वांनी करावे,ह्ण असे आवाहन आमदार मकरंद पाटील यांनी केले.

ठळक मुद्देपंचनामे करून शासनाकडे प्रस्ताव त्वरित सादर करा : मकरंद पाटीलवाईतील शासकीय आढावा बैठकीत महसूल विभागाला सूचना

वाई : महाबळेश्वर , वाई, खंडाळा तालुक्यांत अतिवृष्टीने आलेल्या पुरात सर्वसामान्यांची घरे, शेती, विहिरी, पिके, जनावरे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले. त्यांचे लवकरात लवकर पंचनामे करून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावेत. नुकसानग्रस्तांपर्यंत जास्तीत जास्त शासकीय मदत पोहोचवून त्यांच्या दु:खावर फुंकर घालण्याचे काम सर्वांनी करावे,ह्ण असे आवाहन आमदार मकरंद पाटील यांनी केले.येथील पंचायत समितीच्या सभागृहात वाई, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी बोलविलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर, बाळासाहेब भिलारे, पंचायत समितीच्या सभापती रजनी भोसले, उपसभापती अनिल जगताप, वाईचे तहसीलदार रणजित भोसले, दशरथ काळे, महाबळेश्वरच्या तहसीलदार मीनल कळसकर, वाईच्या मुख्याधिकारी विद्या पोळ, मुख्याधिकारी शंकर गोरे, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, राजेंद्र्र राजपुरे, पंचायत समितीचे सदस्य विक्रांत डोंगरे, मधुकर भोसले, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, नगरसेवक चरण गायकवाड, प्रदीप चोरगे, राजेश गुरव, महादेव मसकर, शशिकांत पवार, मदन भोसले उपस्थित होते.तिन्ही तालुक्यांतील अधिकाऱ्यांनी आपापल्या खात्याचा आढावा दिला. पुरामुळे झालेले नुकसान व पंचनाम्यांचे सुरू असलेल्या कामाबाबत माहिती दिली. यामध्ये महाबळेश्वर तालुक्यात ४५ कुटुंबे विस्थापित केली असून, ६१.३७ हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे.

१५३ घरांचे अंशत: तर सात घरांचे पूर्ण नुकसान झाले. पंधरा गावांमध्ये पाणी पुरवठा योजना, सहा विहिरींचे नुकसान झाले आहे. जिल्हा परिषदेच्या सोळा शाळांचे अंशत: नुकसान झाले आहे. तसेच तीन शेळ्या व सहा म्हसींचा मृत्यू झाला असल्याची माहिती तहसीलदार मीनल कळसकर यांनी दिली.वाई तालुक्यातील मेणवली, खडकी, चिंधवली, सिद्धनाथवाडी येथील सुमारे ९८ कुटुंबे स्थलांतरित केली. २८७ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. ११ विहिरींचे नुकसान झाले असून, नऊ ठिकाणी जमिनी खचल्या आहेत.

सतरा शाळांतील २८ खोल्यांचे नुकसान झाले आहे. तर अंदाजे ५,८०९ हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. ६२ विद्युत खांब पडले असून, सर्व तालुक्यांत विद्युत पुरवठा सुरळीत सुरू आहे. काही गावांमध्ये बंधारे वाहून गेले आहेत. पाझर तलावांना गळती लागली आहे.खंडाळा तालुक्यात तीन कुटुंबे स्थलांतरित केली असून, पाच पुलांचे नुकसान झाले आहे. तर २८२ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चौदा रस्त्यांचे नुकसान झाले आहे. तसेच पुरात वाहून गेल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याचे तहसीलदार दशरथ काळे यांनी सांगितले.यावर आमदार पाटील यांनी पूल, घर तसेच पिकांचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून शासन दरबारी पाठवावेत. तसेच मयत झालेल्या युवकाबाबतही प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना केल्या. तिन्ही तालुक्यांत पुरामुळे प्रचंड नुकसान झाले असून, सर्वच विभागांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीत चांगले काम केले असल्याचे पाटील यांनी नमूद केले.

टॅग्स :Satara Floodसातारा पूरcollectorजिल्हाधिकारीSatara areaसातारा परिसरMakrand Patilमकरंद पाटील