शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

फलटणच्या कत्तलखान्यामधून अतिरेक्यांना वित्त पुरवठा, मिलिंद एकबोटे यांचा खळबळजनक आरोप

By दीपक देशमुख | Published: August 23, 2023 6:15 PM

सातारा : फलटण येथील कत्तलखान्याला राज्य राजकीय वरदहस्त आहे. या कारखान्यातून अतिरेक्यांना वित्त पुरवठा केला जातो. त्यामुळे महाराष्ट्राचे पशुधन ...

सातारा : फलटण येथील कत्तलखान्याला राज्य राजकीय वरदहस्त आहे. या कारखान्यातून अतिरेक्यांना वित्त पुरवठा केला जातो. त्यामुळे महाराष्ट्राचे पशुधन संपवणाऱ्या हा कत्तलखाना तात्काळ बंद करावा, अशी मागणी अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी केली. सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संघटनेचे मंगेश नरे, निवृत्त पशुसंवर्धन आयुक्त सुधीर भोसले उपस्थित होते.एकबोटे म्हणाले, फलटण येथे दोन दिवसांपूर्वी गोरक्षक सौरभ सोनवणे आणि अक्षय तावरे यांच्या सहकार्याने दहा म्हशींची गाडी ताब्यात घेऊन गोशाळेत पाठवण्यात आली. यापैकी चार म्हशी दूध देणाऱ्या होत्या. त्यांची कत्तल गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे तात्पुरती टळली. मात्र, भारतीय प्राणी संवर्धन कायदा लागू होऊन सुद्धा राज्यात प्रभावी अंमलबजावणी होत नाही. फलटण येथील कत्तलखान्यामधून देशी खिलारी गाई आणि म्हशी यांची कत्तल सुरू आहे. हा कत्तलखाना तत्काळ बंद करण्याची मागणी त्यांनी केली.एकबोटे म्हणाले, सध्या भारतात १४ कोटी लिटर दूध उत्पादन होते. मात्र ६४ कोटी लिटर दूध विकले जाते. ही बाब गंभीर आहे. दुधाची भेसळ आणि लोकांचे आरोग्य याबाबत अन्न औषध प्रशासन सुद्धा गंभीर भूमिका घेत नाही. गोधनाचे रक्षण करण्यासाठी पोलिसांच्या बघ्याची भूमिकेमुळे गोरक्षकांना उतरावे लागत आहे. गोरक्षकांना पोलीस संरक्षण मिळावे आणि महाराष्ट्र प्राणी अधिनियम २०१५ची प्रभावी अंमलबजावणी व्हावी.पशुसंवर्धन समिती जिल्हास्तरावर कार्यान्वित करावयाची असून पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी यावर ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. स्वतंत्र टास्क फोर्स नेमून त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमध्ये आर्थिक तरतूद करावयाचे नियमांत आहे. प्रशासनाने इच्छाशक्ती दाखवावी.प्रशासनाने इच्छाशक्ती दाखवावी, असे आवाहन एकबाटे यांनी केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMilind Ekboteमिलिंद एकबोटेterroristदहशतवादी