शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

पुराचे पाणी घरात शिरल्याने अनेकांचा संसार उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:14 IST

चाफळ : चाफळ विभागात झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार उडवून देत मोठ्या प्रमाणात शेतीसह गावपोहोच रस्ते, फरशी पूल, पिण्याच्या पाण्याच्या ...

चाफळ :

चाफळ विभागात झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार उडवून देत मोठ्या प्रमाणात शेतीसह गावपोहोच रस्ते, फरशी पूल, पिण्याच्या पाण्याच्या विहिरींसह दरडी कोसळल्याने नुकसान झाले आहे. चाफळला उत्तरमांड नदीला आलेल्या पुराचे पाणी थेट अनेकांच्या घरात शिरल्याने संसार उपयोग साहित्य भिजून संसार उघड्यावर पडले आहेत.

या नुकसानग्रस्त भागाची माजी शिक्षण सभापती राजेश पवार, सामाजिक कार्यकर्ते काकासाहेब पवार यांनी पाहणी करत संबंधित गावांचे गावकामगार तलाठी, ग्रामसेवक तसेच जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावर जाऊन पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पाटण तालुक्यातील चाफळ विभागाला अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसला आहे. अनेक गावांना जोडणारे रस्ते, फरशीपूल पाण्याखाली गेल्याने तर शिंगणवाडीसह इतर काही ठिकाणी झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतूक ठप्प झाली. डोंगर उतारावरील केळोली, पाडळोशी, धायटी, पाठवडे गावात पावसाचे पाणी शेतात घुसल्याने भात शेती वाहून गेली आहे. पाठवडे बाटेवाडीतून बौध्दवस्तीला जोडणारा रस्ता वाहून गेला. मांडकेश्वर मंदिराची संरक्षण भिंत कोसळली. शेताचे बांध वाहून गेल्याने शेतजमिनीसह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नाणेगाव खुर्द गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर गाळाने भरून पाईपलाईन वाहून गेल्याने पाणीपुरवठा बंद झाला आहे. विरेवाडी मार्गे पाटणला जोडणारा घाट रस्ता खचल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. एकूणच चाफळ विभागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे.

या नुकसानीची माजी शिक्षण सभापती राजेश पवार यांनी पाहणी करत माहिती घेत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते काकासाहेब पवार, रामचंद्र झोरे, विरेवाडी सरपंच शिवाजी जाधव, उमाजी जाधव, ग्रामसेवक तात्यासाहेब दंडिले उपस्थित होते.

दरम्यान पवार यांनी संबंधित तलाठी, ग्रामसेवक तसेच जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना केल्या.