शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

भुस्खलनाच्या मुळाशी वणव्याची धग! आगीच्या ज्वालांनी जमिनींची पाणी धारण क्षमता झाली कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 11:02 AM

Satara News : दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने पाटण, वाई महाबळेश्वर परिसरात २० हून अधिक गावांमध्ये भुस्खलनाच्या घटना घडल्या आहेत

प्रगती जाधव-पाटीलसातारा - वारंवार वणवे लागल्याने जमिनीच्या पाणी धारण क्षमतेवर मर्यादा येत आहेत. याबरोबरच निसर्गाच्या सानिध्यात घरकुल बांधताना डोंगर उतारावरील जागांचे होणारे सपाटीकरण हे वाढत्या भुस्खलनाचे महत्वपूर्ण कारण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने पाटण, वाई महाबळेश्वर परिसरात २० हून अधिक गावांमध्ये भुस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. लिंगमळा धबधब्याकडे जाणारा रस्ता उभा चिरला गेलाय तर बहुतांश ठिकाणी पानगळ व्हावी असे कडे कोसळू लागले आहेत. पावसाच्या या तांडवाने किमान तीस जणांचा मृत्यू झालाय तर कोट्यावधी रूपयांचे वित्तीय हानी झाली आहे.

निसर्गाच्या या प्रकोपात मानवी हस्तक्षेपाचा मोठा भाग असल्याचे जिल्ह्यातील या दुर्घटनांमधून पुढे आले आहे. जानेवारी ते मे या पाच महिन्यांमध्ये केवळ गंमत म्हणून अनेकांनी वनक्षेत्राला वणवा लावला. जिथं माणूस पोहोचत नाही, तिथेही आगीच्या ज्वाला पोहोचल्या आणि मातीचा वरील थर पूर्णपणे भुसभुशीत केला. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याऐवजी माती घेऊनच खाली घसरू लागले, त्यामुळे पाण्याच्या मुख्य प्रवाहात डोंगरातील माती वाहून आली आणि ठिकठिकाणी या मातीनेच पाणी आडवून ठेवले.

शहराच्या प्रदुषणापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात स्वत:चे भव्यदिव्य ‘विला’ बांधण्यासाठी डोंगर उतारावरील जमिनींचे झालेले सपाटीकरणही या घटनांमागील महत्वाचे कारण ठरत आहे. नैसर्गिकरित्या पाणी वाहून नेण्यासाठी उपलब्ध असलेल्या जागा सपाट झाल्याने पावसाचे हे पाणी मिळेल त्या दिशेने वाहत आहे. परिणामी घरांचे बांधकाम करताना इमारतीचा पाया मजबूत होतोय पण डोंगर ढिसूळ होतोय याकडे दुर्लक्ष होत आहे.

मानवी विकासाची पहिली कुऱ्हाड निसर्गावर पडतेय, असं म्हणतात. मानवाच्या चुकीमुळे होणारे हे नुकसान अनेक कुटूंबांना उध्दवस्त करतंय. चुक कोणाची  याहीपेक्षा भविष्यात हे होऊ  नये यासाठी प्रयत्न पूर्वक उपाययोजना जागल्याच्या भूमिकेतून प्रशासनाने करावी, अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त होत आहे.आपत्ती व्यवस्थापनाचा गृहपाठच नाही!

जिल्हाधिकारी कार्यालयात अस्तित्वात असलेले आपत्ती व्यवस्थापन विभागाने यापूर्वीही आणि आत्ताही आपला गृहपाठच केला नसल्याचे समोर आले आहे. गेल्या दोन पावसांचा अनुभव, जिल्ह्यातील डोंगर उतारावरील गावे यासह तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून प्रतिबंधात्मक उपाय करण्याचा विचारच या विभागाकडून होत नाही. आपत्ती आल्यावर धावधाव करण्यापेक्षा ती येऊ नये यासाठी आवश्यक तयारी आणि खबरदारी घेण्याचीही सवड या विभागाला नाही, हे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात वणव्यांची संख्या वाढली आहे. आगीच्या भक्ष्यसथानी गेलेल्या डोंगरांमुळे वनअच्छादन क्षेत्र कमी झालं. या भागातील तांबड्या मातीची पाणी धारण क्षमता कमी आहे, त्यात मानवी हस्तक्षेपामुळे पाण्याचे डोंगर उतारावरील नैसर्गिक प्रवाह बदलल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

- सुनिल भोईटे, मानद वन्यजीव रक्षक, सातारा

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरenvironmentपर्यावरणRainपाऊस