शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षांवर गुन्हा दाखल करा अन्यथा उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:25 IST

कराड कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक केली आहे. तसेच सभागृहाची दिशाभूलही केली असल्यामुळे त्यांच्यावर ...

कराड

कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक केली आहे. तसेच सभागृहाची दिशाभूलही केली असल्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अन्यथा १ जुलैपासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा मंगळवारी यशवंत जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्र यादव यांनी दिला. त्यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना याबाबतचे लेखी निवेदनही दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, दि. २५ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेली सभा व नंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आजपर्यंत चालू असलेले कागदपत्रांचा खेळ पाहता नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासन व सर्व नगरसेवक आणि सभागृहाची दिशाभूल करत आहेत. पदाचा गैरवापर करून पीठासन अधिकारी असल्याने सभागृहातील बहुमताचा अनादर नगराध्यक्षा शिंदे करत आहेत. सभाशास्त्रांच्या नियमांची पायमल्ली करून जो मनमानी कारभार नगराध्यक्षा शिंदे करत आहेत त्यासंदर्भात योग्य ते मार्गदर्शन करून जिल्हाधिकारी सिंह यांनी समज देणे गरजेचे आहे.

स्वतःच्या सहीच्या अधिकाराची भीती घालून प्रशासनाला वेठीस धरतात तसेच ठरावात, प्रोसेडिंग व मिनिट बुकमध्ये अदलाबदल करणे संबंधित सभेची ऑडिओ, व्हिडिओ रेकॉर्डिंग गायब करणे, त्यात पाहिजे ते बदल करून रेकॉर्डिंग ठेवणे. याचप्रमाणे बजेट संदर्भातील ऑडिओ, व्हिडीओ रेकॉर्डिंगमध्ये सुध्दा बदल केलेले आहेत. साडेचार वर्षामध्ये वेळोवेळी नगराध्यक्षांचा संबंधित नगरपरिषदे संदर्भात केलेला खोटारडेपणा, शासनाची फसवणूक, सभागृहाची दिशाभूल, लोकशाहीमध्ये बहुमताचा अनादर व स्वत:चा मनमानी कारभार यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार करून योग्य तो निर्णय घेणेबाबत जनशक्ती आघाडीने दाद मागितली आहे.

नगराध्यक्षा यांनी स्वत: ठराव तयार न करता अंदाजपत्रक जिल्हाधिकारी सिंह यांनी न दिल्यामुळे रखडले आहे. नगराध्यक्षांच्या या खोटारडेपणा व आठमुठेपणामुळे शहराचा विकास थांबला आहे. त्याचबरोबर नगरपरिषदेचे आर्थिक नुकसानदेखील होत आहेत. कोरोनासारख्या महामारीमध्ये अर्थसंकल्प मंजूर नसलयाने महत्त्वाचे निर्णय घेण्यास व विकास कामांसाठी खर्च करण्यास नगरपरिषद प्रशासनास अडचण निर्माण होत आहे.

गेली ३ ते ४ महिने अर्थसंकल्प नगराध्यक्षांच्या मनमानीमुळे व खोटारडेपणामुळे प्रलंबित पडला आहे. संबंधित विषयामध्ये जिल्हाधिकारी यांनी त्वरित निर्णय घेणे अपेक्षित होते. वारंवार जिल्हा प्रशासनाकडे मागणी करूनदेखील अद्यापही कोणताही निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेण्यात आलेला नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी उद्या ३० जुलैपर्यंत निर्णय न घेतल्यास नगराध्यक्षा तसेच पालिका प्रशासन यांच्या विरोधात संबंधित कार्यालय बंद करून कामकाज करू देणार नाही, असा इशारा यशवंत जनशक्ती आघाडीचे गटनेते, नगरसेवक राजेंद्र यादव यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.