शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

टाकी बनतेय कर्दनकाळ !

By admin | Updated: November 11, 2014 00:04 IST

वडूज : ग्रामपंचायतीला अंतिम क्षणाची प्रतीक्षा; नोटीस लावूनही नागरिकांची वर्दळ सुरूच

वडूज : ग्रामपंचायतीने ‘प्रवेश बंद’ अशी जाहीर नोटीस लावूनदेखील धोकादायक पाण्याच्या टाकीखालून नागरिकांची वर्दळ सुरूच आहे. त्यामुळे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षापासून पाण्याची टाकी व्हेंटिलेटरवर असून, ती पडण्याची वाट ग्रामपंचायत पाहतेय का? असा प्रश्न ग्रामस्थांना पडत आहे. वडूज येथील पाण्याच्या टाकीपासून उपनगर असणारे कर्मवीरनगर, आमराईनगर, विठ्ठलनगर, शिवक्रांतीनगर, भाग्योदयनगर, गुलमोहर कॉलनी, तुपेवस्ती येथून बसस्थानकाकडे शाळा, कॉलेज व शासकीय कार्यालयाकडे जाणारा रस्ता आहे. हा रस्ता, पायवाट दुचाकीस्वारांना जवळ पडत असल्याने येथून दैनंदिन हजारोंच्या संख्येने नागरिकांची वर्दळ सुरू असते. परंतु ग्रामपंचायतींच्या प्रवेश बंद जाहीर नोटिसीला वाटाण्याच्या अक्षता लावून प्रसंगी जीवमुठीत घेऊन येथून ये-जा सुरूच असते. यापूर्वी या पाण्याच्या टाकीमध्ये एका महिलेने आत्महत्या केली होती. त्यामुळे या परिसरात ग्रामपंचायतीने एका कामगाराचे कुटुंब वास्तव्यास ठेवले. पाण्याच्या टाकीवर प्रकाशझोत सुरू ठेवला आहे. त्यामुळे हे कुटुंबसुध्दा जीव मुठीत घेऊन वास्तव करीत आहे. या पाण्याच्या टाकीसंदर्भात पाणीपुरवठा विभागाकडून माहिती घेतली असता, सांगण्यात आले की गत दीड वर्षापूर्वी ही टाकी धोकादायक अवस्थेत असल्याचे ग्रामपंचायतीकडून लेखी स्वरूपात माहिती प्राप्त झाली. त्यानुसार ही टाकी व तेथून ले-आऊटसाठी (पाणी वितरित करण्यासाठी) असा अंदाजे खर्च सव्वा कोटीचा असल्याचे इस्टिमेट तयार केले. परंतु या कामी लागणारी लोकवर्गणी न भरल्यामुळे या निविदा रद्द झाल्या. या घटनेला जबाबदार कोण, असा प्रश्न समोर आला आहे.वडूज शहराची नळपाणी पुरवठा योजनेचे वीजबिल भरताना ग्रामपंचायतीला नाकीनऊ येत असताना ही लोकवर्गणी भरणे महाकठीण बनले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीची ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी गत झाली आहे. त्यामुळे वडूज शहरातील या निकृष्ट टाकीचे लवकरात लवकर काय ते ठरवावे व नवीन टाकी उभारावी, अशी मागणी वडूजकर नागरिकांतून जोर धरू लागली आहे. (प्रतिनिधी) प्रशासनाने दखल घ्यावी रस्त्याच्या कामांना ठेकेदारच लोकवर्गणी भरतात तर बांधकाम अथवा पाण्याच्या टाकीसाठीच लोकवर्गणी भरण्यात ग्रामस्थ टाळाटाळ का करतात, ही ओरड कशासाठी असा जाहीर सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून उमटत आहे. ग्रामसभेत ठराव झाले असले तरी या जीवघेण्या प्रश्नावर संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संभाव्य अपघात टाळावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. गत चार वर्षांपूर्वी नवीन टाकीचा प्रस्ताव ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयाकडे सादर केल्यानंतर तो मंजूरदेखील करण्यात आला होता. परंतु दहा टक्के लोकवर्गणी ग्रामस्थांनी न भरल्यामुळे ती निविदा रद्द करण्यात आली. गेल्या आठवड्यात दुसरा प्रस्ताव नवीन चार टाक्यांचा आलेला आहे. या प्रस्तावानुसार तहसील कार्यालयाजवळील टाकी, काळे मळा, शिवाजीनगर, मागासवर्गीय वस्ती येथील नवीन टाकी प्रस्ताव सादर केला आहे. या नवीन टाक्यांचा प्रस्ताव प्रलंबित आहे.-डी. ए. भोसलेग्रामविकास अधिकारी, वडूजवडूजमधील धोकादायक असणाऱ्या पाण्याच्या टाकीजवळ ग्रामपंचायतीने प्रवेश बंद बाबत फलक लावला असलातरी त्याकडे नागरिक व वाहनधारक दूर्लक्ष करीत आहेत. या टाकीजवळून शेकडोच्या संख्येने दररोज नागरिक व वाहनधारक जात आहेत. या फलकावर काही अपघात झाल्यास त्याला ग्रामपंचायत जबाबदार राहणार नाही, असे स्पष्ट केलेले आहे. याचा कुठेतरी विचार होण्याची आवश्यकता आहे.