शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
4
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
5
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
6
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
7
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
8
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
9
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
10
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
11
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
12
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
13
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
14
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
15
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
16
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
17
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
18
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
19
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
20
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा

corona virus Goa Border : गोव्यात कामाला जाणाऱ्यांना दिलासा, ई पासची अट रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 12:10 PM

CoronaVIrus Goa Sindhudurg Border : गोव्यात कामासाठी जाणार्‍या युवक-युवतींना ई-पासची गरज नाही.पुढील दोन ते तीन दिवसासाठी त्यांना सुट देण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या कामावरील ओळखपत्र कींवा ग्रामपंचायत मधील ओळखपत्राच्या माध्यमातून त्यांना सुट देण्यात येणार आहे.  याबाबत लवकरच तहसिलदार राजाराम म्हात्रे बैठक घेऊन तशा आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाला देणार आहे.

ठळक मुद्देगोव्यात कामाला जाणाऱ्यांना दिलासा, ई पासची अट रद्द ग्रामपंचायत पत्र, कामावरील ओळखपत्र बंधनकारक, रूपेश राऊळ यांचा पुढाकार

सावंतवाडी :गोव्यात कामासाठी जाणार्‍या युवक-युवतींना ई-पासची गरज नाही.पुढील दोन ते तीन दिवसासाठी त्यांना सुट देण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या कामावरील ओळखपत्र कींवा ग्रामपंचायत मधील ओळखपत्राच्या माध्यमातून त्यांना सुट देण्यात येणार आहे.  याबाबत लवकरच तहसिलदार राजाराम म्हात्रे बैठक घेऊन तशा आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाला देणार आहे. याबाबत चा तोडगा शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी बोलून काढला तसेच पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी ही राऊळ यांच्या तोडग्याला मान्यता दिली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठ्याप्रमाणात युवक युवती गोव्यात रोजगार तसेच शिक्षणासाठी जातात मात्र गोव्यात सध्या कोरोनाचे रूग्ण मोठ्याप्रमाणात मिळत आहेत.त्याचा प्रसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ नये यासाठी महाराष्ट्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्यांसाठी ई पास ची अट घातली होती पण या अटी मुळे गोव्यातून येणाऱ्या ना मोठा फटका बसल्याने सर्वच राजकीय पक्ष आपल्या परीने तोडगा काढत आहेत.

त्याप्रमाणेच तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी गोव्यात जाणाऱ्यासाठी ई-पासची अट तात्पुरती रद्द केली आहे. पुढील दोन ते तीन दिवसासाठी त्यामधून सुट देण्यात आली आहे.तसेच नंतर त्यांच्या कामावरील ओळखपत्र कींवा ग्रामपंचायत मधील ओळखपत्राच्या माध्यमातून त्यांना सुट देण्यात येणार आहे.यासाठी राऊळ यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली तसेच त्यानंतर पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी ही पालकमंत्री सामंत यांच्या आदेशाला अनुकूलता दर्शविली असून तहसिलदार राजाराम म्हात्रे यांनी ही आपण आरोग्य विभाग तसेच ग्रामपंचायत प्रशासन यांची बैठक घेऊन या युवक युवतीना ग्रामपंचायत च्या माध्यमातून पत्र तर कामावरील ओळखपत्र दाखवल्यानंतर सोडण्यात येणार आहे.यामुळे गोव्यात जाणाऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.पालकमंत्र्यासह खासदारांकडून पाठपुरावासावंतवाडी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी ई पासची अट रद्द व्हावी यासाठी प्रशासनाशी चर्चा करत असतनाच पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी यातून तोडगा काढला त्यामुळेच हे शक्य झाल्याचे राऊळ यांनी सांगितले

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbanda-pcबांदाgoaगोवाsindhudurgसिंधुदुर्ग