शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पालखी सोहळ्यापूर्वी कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क फलटण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी होऊ न शकलेल्या आषाढी वारीला यंदा पोषक वातावरण आहे का, गावात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

फलटण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी होऊ न शकलेल्या आषाढी वारीला यंदा पोषक वातावरण आहे का, गावात कोरोनाची परिस्थिती कशी आहे याबाबत श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे अध्यक्ष डॉ. अभय टिळक यांनी पालखी मार्गावरील गावांचे सरपंच व पालिका नगराध्यक्षांशी पत्रव्यवहार केला आहे. या गावांनी येत्या चार पाच दिवसांत आळंदी संस्थानला उत्तर द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पालखी सोहळ्याच्या वेळापत्रकानुसार यंदा दि. २ जुलै रोजी श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे पंढरीच्या दिशेने प्रस्थान होईल, तथापि कोरोना लसीकरण, प्रतिबंधात्मक उपाययोजना आदी परिस्थितीचा विचार करता यंदाच्या पालखी सोहळ्यासंदर्भात गावचे प्रतिनिधी या नात्याने आपली भूमिका जाणून घेणे संस्थान कमिटीस अगत्याचे वाटत आहे. त्यामुळे आपापल्या ठिकाणचा आढावा घेऊन त्याची माहिती संस्थानास द्यावी, असे या पत्रात नमूद केले आहे. सध्याची परिस्थिती व सोहळ्याचा मुक्काम आपल्या गावी असेल त्या वेळेची व संभाव्य परिस्थिती याचा साधकबाधक विचार करून आषाढी वारीचे स्वरूप यंदा कसे असावे याबाबत निर्णय घेतला जाईल.