शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूस कारणीभूत; रिक्षाचालकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:52 IST

सातारा : पुणे - बंगळुरू महामार्गावर शेंद्रे गावच्या हद्दीत बेदरकारपणे रिक्षा चालवून मागे बसलेल्या प्रवाशाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी रिक्षाचालकावर ...

सातारा : पुणे - बंगळुरू महामार्गावर शेंद्रे गावच्या हद्दीत बेदरकारपणे रिक्षा चालवून मागे बसलेल्या प्रवाशाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी रिक्षाचालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

विनोद धोंडिराम धेंडे (४३, रा. मुंबई, मूळ रा. बेनापूर, ता. खानापूर जि. सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रिक्षाचालक विनोद धेंडे हे दि. ११ फेब्रुवारी रोजी रिक्षा (क्र. एमएच ०३ सीटी ३३०५) घेऊन कोल्हापूरच्या दिशेने निघाले होते. यावेळी त्यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना तसेच विमाही नव्हता. पुणे - बंगळुरू महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून ते रिक्षा बेदरकारपणे, अविचाराने चालवत होते. शेंद्रे गावच्या हद्दीत आले असताना विनोद धेंडे याने रिक्षाला कट मारल्यामुळे मागील सीटवर बसलेले मोहन शिवा कांबळे (वय ५०) हे रस्त्यावर पडले. यात त्यांच्या डोक्याला, हात, पाय, चेहऱ्याला गंभीर जखम झाली. यानंतर त्यांना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मोहन कांबळे यांच्यावर मुंबई येथे उपचार सुरू असल्याची माहिती सातारा तालुका पोलीस ठाण्यातून देण्यात आली. दरम्यान, या अपघाताची चौकशी सातारा तालुका पोलीस ठाण्यातून सुरू असताना जखमी मोहन कांबळे यांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यातील हवालदार समीर बाळकृष्ण महांगडे (वय ३२) यांनी रिक्षाचालक धेंडे याच्यावर मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मनोहर फरांदे हे करत आहेत.