शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
5
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
6
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
7
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
8
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
9
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
10
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
11
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
12
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
13
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
14
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
15
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
16
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
17
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
18
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
19
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
20
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
Daily Top 2Weekly Top 5

कालवा उशाला अन्‌ कोरड घशाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:17 IST

आदर्की : फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागाला वरदान ठरलेला धोम-बलकवडी कालवा आदर्कीच्या ओढ्याखालून गेल्याने नैर्सगिक पाण्याचे स्रोत तुटल्याने ओढा कोरडा ...

आदर्की : फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागाला वरदान ठरलेला धोम-बलकवडी कालवा आदर्कीच्या ओढ्याखालून गेल्याने नैर्सगिक पाण्याचे स्रोत तुटल्याने ओढा कोरडा पडला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात आल्याने कालवा उशाला अन् कोरड घशाला, अशी अवस्था आदर्कीतील शेतकऱ्यांची झाली आहे.

फलटण तालुक्यातील ८४ गावे दुष्काळाने होरपळत होती. दुष्काळात गावेच्या गावे स्थलांतरित होत होती, म्हणून कृष्णेचे पाणी दुष्काळी भागाला मिळावे म्हणून धोम धरणातून सांगली जिल्ह्याला गेलेल्या धोम कालव्याला शिवथर खिंडीतून समांतर कालवा काढून अंबवडे, देऊर, वाठार गाव, महाकाली दरी, आदर्की असा सर्व्हे झाला होता; पण राजकीय इच्छाशक्तीमुळे मंजुरी मिळाली नाही. त्यानंतर १९९६ मध्ये युती शासनाच्या काळात बलकवडी धरणास मंजुरी मिळाली. धरणाचे काम सुरू असताना कालव्याचे सर्वेक्षण सुरू झाले. त्यावेळी आदर्की खुर्द येथे खंडोबा मंदिर, बिचकुले वस्ती, काळवट, सापमारी तलावाच्या वरच्या बाजूने सर्व्हे झाला. त्यानंतर पाच वर्षांनी सर्व्हे बदलून गावाजवळून सर्व्हे झाला. त्यामुळे कालवा तीस फूट खोल झाला, तर पाझर तलावाच्या खालच्या बाजूने बोगदा पाडून कालवा खुदाई झाली. आदर्की खुर्द मुख्य ओढा व छोटे दोन ओढ्यांच्या खालून कालवा गेल्याने नैसर्गिक पाण्याचे त तुटल्याने कालवा वाहत असला तरी ओढा कोरडाच असतो. त्यामुळे प्रत्येकवर्षी दुष्काळ पडत होता म्हणून लोकवर्गणीतून चारशे फूट चारी खोदून सिमेंट पाईप टाकून ओढ्याला कालव्यातून पाणी सोडण्याची व्यवस्था केली; पण कालव्यातील पाईप बसवताना कालव्याच्या तळाला बसवली नाही, त्यामुळे ओढ्यातील पाणी पाईपमधून येत नाही, त्यामुळे ओढा कोरडा पडतो. सहा बंधारे व अनेक विहिरींची पाणी पातळी खालावल्यामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत.

(चौकट)

सिमेंट बंधाऱ्यातील पाणी कालव्यात...

आदर्की-हिंगणगाव ओढा नैसर्गिक पाण्याने नऊ महिने वाहत असे. धोम-बलकवडी कालवा झाल्यापासून दोन-तीन महिनेच वाहतो. नैसर्गिक पाण्याचे स्रोत तुटले आहेत, तर कृषी खात्याने कालव्याच्या शंभर फूट वरच्या बाजूला सिमेंट बंधारा बांधल्याने बंधाऱ्यातील पाणी कालव्यात येते. दुसरा सिमेंट बंधारा कालव्याच्या दोनशे फुटांवर खालच्या बाजूला बांधल्याने पुराच्या पाण्याने बंधरा भरला की कालव्यात पाणी उतरते.

(कोट..)

धोम-बलकवडी उजव्या कालव्यामुळे जिरायती क्षेत्र बागायती झाले; पण आदर्की खुर्द-हिंगणगाव ओढा कोरडा पडत असल्याने रब्बी व उन्हाळी हंगाम धोक्यात येतो. पाणी ओढ्यात येण्यासाठी पाईप बसवल्या आहेत. पण ओढ्याचे पाणी पाईपमधून येत नाही. त्याची पाहणी करून ओढ्याचे नैसर्गिक पाणी ओढ्याला सोडून ओढा प्रवाहित करावा.

- विश्वासराव निंबाळकर, ज्येष्ठ नागरिक, आदर्की खुर्द

०१आदर्की ओढा

फोटो -

धोम-बलकवडी कालवा आदर्कीच्या ओढ्याखालून गेल्याने नैसर्गिक पाण्याचे स्रोत तुटल्याने आदर्की-हिंगणगाव ओढा कोरडा पडला आहे.