शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
3
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
4
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
5
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
7
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
10
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
11
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
12
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
13
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
14
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
15
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
16
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
17
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
18
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
19
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
20
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’ची वसंतदादा कारखान्यावर धडक

By admin | Updated: September 18, 2015 23:33 IST

आॅक्टोबरमध्ये बेमुदत उपोषण : ऊस उत्पादकांना ३२ कोटी देण्याची मागणी

सांगली : वसंतदादा साखर कारखान्याने दोन्ही गळीत हंगामातील ३२ कोटी रुपयांचे उसाचे बिल शेतकऱ्यांना त्वरित द्यावे, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शुक्रवारी कारखान्यावर धडक दिली. दि. ३० सप्टेंबरपर्यंत बिल दिले नाही, तर १ आॅक्टोबरपासून कारखान्यासमोरील वसंतदादांच्या पुतळ्यासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी दि. ३० सप्टेंबरपर्यंत एफआरपीनुसार सर्व बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल, असे आश्वासन दिले.वसंतदादा कारखान्याने २०१३-२०१४ या हंगामाअखेरीस ऊस पाठविलेल्या शेतकऱ्यांना एकूण बिलाच्या ६० टक्के, काहींना ४० टक्के, तर काहींना २० टक्के याप्रमाणात बिले दिली. आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर बिले देऊ, अशी बोळवण करण्यात आली. मागील थकित बिले मिळतील, या आशेवर शेतकऱ्यांनी पुन्हा २०१४-२०१५ या हंगामात गाळपासाठी ऊस पाठविला, पण आजअखेर कारखान्याने सुमारे दोनशे शेतकऱ्यांना एक रुपायाही बिल दिले नाही. याप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व पलूस पंचायत समितीचे सदस्य संदीप राजोबा, महेश खराडे, सूर्यकांत मोरे, अशोक मगदूम, अनिल पाटील, कुमार पाटील, गोटू पाटील यांच्या नेतृत्वाखाली पलूस तालुक्यातील वसगडे, भिलवडी, अंकलखोप, माळवाडी, खटाव, ब्रह्मनाळ आदी गावांतील शेतकऱ्यांनी वसंतदादा कारखान्यावर मोर्चा काढून मागण्यांकडे लक्ष वेधले.कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी आंदोलकांच्या मागण्या जाणून घेतल्या. त्यानंतर ते म्हणाले की, कारखान्यावर २०१३-२०१४ या हंगामातील बिलासाठी मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू असल्यामुळे बिल देण्यात अडचणी निर्माण होत आहेत. तरीही केंद्र आणि राज्य शासनाकडून व्याजाच्या हमीवर कर्ज उपलब्ध होणार आहे. या रकमेतून दोन्ही वर्षाची बिले देऊ. दि. ३० सप्टेंबरपर्यंत एफआरपीनुसार पैसे बँकेत खात्यावर वर्ग करण्यात येतील. धडक योजना तोट्यात असतानाही, प्रशासन शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना त्या चालवत आहे. पाणीपट्टी भरा आणि ऊस कुठेही पाठवा, आमची त्याला काही हरकत नाही. या आश्वासनानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.दरम्यान, संदीप राजोबा यांनी सांगितले की, कारखाना प्रशासनाने दि. ३० सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग केले नाहीत, तर १ आॅक्टोबरपासून बेमुदत उपोषण सुरू करणार आहे. त्यावेळी पैसे दिल्याशिवाय येथून एकही शेतकरी उठणार नाही. (प्रतिनिधी)मालमत्ता जप्तीचे आदेश मागे घेण्याची मागणी कारखान्याकडे २०१३-१४ वर्षातील गाळपास आलेल्या उसाचे शेतकऱ्यांचे ४५ कोटी रूपये थकित होते. या रकमेसाठीच साखर आयुक्तांनी जप्तीची कारवाई केली होती. त्यानुसार मिरज तहसीलदारांनी मालमत्ता जप्तीचे आदेश दिले होते. परंतु, प्रत्यक्षात वर्षभरात महसूल व साखर आयुक्त विभागाकडून कोणतीही प्रक्रिया झाली नाही. शेतकऱ्यांनाही बिल मिळाले नाही. असे असेल तर जप्तीच्या आदेशाला अर्थ काय?, असा सवाल शेतकरी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. त्यांच्या सुरात सूर मिसळत अध्यक्ष विशाल पाटील यांनीही, ‘मीही हेच म्हणतो की, मालमत्ता जप्तीचे आदेश देऊन प्रश्न सुटणार नाही. तो आदेश प्रशासनाने मागे घ्यावा. बँकेकडून कर्ज उपलब्ध करून लगेच पैसे वर्ग करण्यात येतील,’ असे सांगितले. ४५ कोटीपैकी आतापर्यंत ३० कोटी शेतकऱ्यांना दिले असून केवळ १५ कोटीच शिल्लक आहेत. त्यानुसार सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन कारवाई मागे घेण्याची मागणी करणार असल्याचे राजोबा यांनी सांगितले.