शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

भवानीनगर येथे ५ पासून शैला सायनाकर व्याख्यानमाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:28 IST

शिरटे : भवानीनगर (ता. वाळवा) येथील जागृती साहित्य संस्कार मंडळाच्यावतीने शुक्रवार दि. ५ ते दि. ७ फेब्रुवारीअखेर कवयित्री शैला ...

शिरटे : भवानीनगर (ता. वाळवा) येथील जागृती साहित्य संस्कार मंडळाच्यावतीने शुक्रवार दि. ५ ते दि. ७ फेब्रुवारीअखेर कवयित्री शैला सायनाकर व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे.

दि. ६ रोजी श्रीमंत कोकाटे यांच्याहस्ते ‘जागृती’ पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सुहास सावंत, उपाध्यक्षा वनीता मोहिते व सचिव निवास पवार यांनी दिली.

क्रांतिसिंह नाना पाटील विद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या या व्याख्यानमालेचे यंदा १८ वे वर्ष आहे. दि. ५ फेब्रुवारी रोजी इस्लामपूरचे पोलीस उपअधीक्षक कृष्णत पिंगळे यांचे ‘आजची तरुणाई आणि पोलिसांची भूमिका’ या विषयावर, ६ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ इतिहास संशोधक व साहित्यिक डॉ. श्रीमंत कोकाटे यांचे ‘शिवचरित्रातून आज काय शिकावे’ यावर व्याख्यान होणार आहे. याचदिवशी गावचे पुत्र व कोपरगाव येथील सहकारी संस्थांचे शासकीय लेखापरीक्षक दीपक सावंत यांना जागृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

७ फेब्रुवारी रोजी शिराळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर यांचे ‘मी कसा घडलो’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. व्याख्यानमालेसाठी श्रोत्यांनी मास्क वापरणे सक्तीचे आहे.

यावेळी संजय पाटील, विजयकुमार सावंत, प्रकाश संकपाळ, धनंजय राजहंस, सचिन गोडसे, सुवर्णा कांबळे, वैशाली सिंहासने, ज्योती मेहता, धनश्री राजहंस, शुभांगी पाटील, स्वाती मोहिते उपस्थित होत्या.

फोटो - ०१०२२०२१-आयएसएलएम-दिपक सावंत