शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

एका पावसात सांगली जलमय

By admin | Updated: June 10, 2015 00:29 IST

मुसळधार पावसाने झोडपले : गुंठेवारीची दैना, शहरवासीयांच्या नशिबी वनवास

सांगली : मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाने सांगली शहर जलयम झाले. शहरातील स्टेशन चौक, मारुती चौक, झुलेलाल चौकात गुडघाभर पाणी साचले होते, तर उपनगरे चिखलात रुतली होती. गुंठेवारीतील नागरिकांची तर दैना उडाली असून सर्वत्र दलदलीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. तब्बल दीड तास पावसाने झोडपून काढले. या पावसाने शहरवासीयांची दैना उडाली. शासकीय कर्मचारी कार्यालयातच अडकून पडले होते. शहरातील स्टेशन चौकात गुडघाभर पाणी साचून होते. त्यातून मार्ग काढताना वाहनधारकांची तारांबळ उडत होती. अनेक वाहने रस्त्यावर बंद पडली होती. स्टेशन चौकाच्या दुतर्फा पाणी साचून होते. महापालिका मुख्यालय, काँग्रेस भवनसमोर पाणी होते. आंबेडकर क्रीडांगणालाही तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. झुलेलाल चौक, मारुती चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. मारुती चौकातील भाजी, फळ विक्रेत्यांची पावसाने चांगलीच तारांबळ उडवली. गुंठेवारीत पालिकेने ड्रेनेजच्या चरी खोदल्या आहेत. उपनगरांत पाणी व ड्रेनेजसाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यांची खुदाई झाली आहे. या चरी अद्याप बुजविलेल्या नाहीत. त्यामुळे सर्वत्र चिखल झाला होता. शामरावनगर, आप्पासाहेब पाटीलनगर येथे पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा नसल्याने, रस्ते, गटारी, भूखंडावरून पाणी वाहत होते. (प्रतिनिधी)$$्निरेल्वे रुळ पाण्यात !विश्रामबाग येथील रेल्वे रूळ प्रथमच पाण्यात गेला होता. त्यामुळे रेल्वेची वाहतूकही संथगतीने सुरू होती. मारुती चौक पूर्णत: पाण्याखाली गेला होता. आनंद चित्रमंदिरापर्यंत पाणी शिरले होते. राजवाडा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून होते. झुलेलाल चौक, आंबेडकर रस्ता पाण्याखाली होता.शामरावनगर, आप्पासाहेब पाटीलनगर, रामकृष्ण सोसायटी, त्रिमूर्ती कॉलनी परिसरात चिखलाचे साम्राज्यशहरातील सर्वच रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक दोन तास विस्कळीत