शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

सांगली :  नियतीचा आघात, तरीही दुष्काळाशी दोन हात..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 4:00 PM

नियतीच्या आघाताने अपंगत्वाशी संघर्ष करणाऱ्या बस्तवडे (ता. तासगाव) येथील तीसभर दिव्यांगांनी अपंगत्वावरही मात केली. पानी फौंडेशनच्या माध्यमातून दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी कंबर कसली. पंचेचाळीस दिवसांत मोठ्या जिद्दीने श्रमदान करून तब्बल आठ माती नालाबांध तयार केले. अपंगत्वावर मात करून धडधाकट माणसाला लाजवेल, असे काम केले.

ठळक मुद्देनियतीचा आघात, तरीही दुष्काळाशी दोन हात..!बस्तवडेत दिव्यांगांचा आदर्श : श्रमदानातून साकारले माती नालाबांध

दत्ता पाटील 

तासगाव : नियतीच्या आघाताने अपंगत्वाशी संघर्ष करणाऱ्या बस्तवडे (ता. तासगाव) येथील तीसभर दिव्यांगांनी अपंगत्वावरही मात केली. पानी फौंडेशनच्या माध्यमातून दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी कंबर कसली. पंचेचाळीस दिवसांत मोठ्या जिद्दीने श्रमदान करून तब्बल आठ माती नालाबांध तयार केले. अपंगत्वावर मात करून धडधाकट माणसाला लाजवेल, असे काम केले.अपंग माणूस धडधाकट माणसासारखे काम करू शकत नाही, हा समज तासगाव तालुक्यातील बस्तवडे येथील दिव्यांगांनी खोडून काढला आहे. काही महिन्यांपूर्वी गावातीलच कविता सिद्राम पाटील यांनी गावातील दिव्यांगांचा शोध घेत संघर्ष दिव्यांग संघटनेची स्थापना केली.

कोण पायाने अपंग, कोणाला पूर्णपणे अंधत्व, कोण कर्णबधिर, कोण गतिमंद, अशा एक ना अनेक दिव्यांगांना एकत्रित करत कविता पाटील यांनी संघटना स्थापन केली. दिव्यांग म्हणून किमान स्वत:चे हक्क मिळवता यावेत, एवढ्याच माफक अपेक्षेने या संघटनेची स्थापना झाली.प्रत्येक सभासदाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. नेमके याच काळात दीड महिन्यांपूर्वी गावात वॉटरकप स्पर्धेअंतर्गत पानी फौंडेशनचे काम सुरु झाले. या संघटनेतील प्रत्येक सदस्य अपंगत्वापेक्षाही घरच्या परस्थितीनेच जास्त पिचलेला.

दुष्काळाच्या झळा यांनाही सोसाव्या लागलेल्या. त्यामुळे या सर्व दिव्यांगांनी पहिल्याचदिवशी दुष्काळाशी दोन हात करण्याचा निर्धार केला. ८ एप्रिलला मध्यरात्री १२ वाजताच कामाचा श्रीगणेशा केला. त्यादिवसापासून एकही दिवस न चुकता, न थकता कामात सातत्य ठेवले. दीड महिन्यात तब्बल आठ माती नालाबांध तयार केले.आधार कोण देणार?तहसीलदार सुधाकर भोसले यांनी संघटनेतील बहुतांश दिव्यांगांना पेन्शन मंजूर करून दिली. त्यामुळे सहाशे रुपयांचा आधार कुटुंबाच्या खर्चासाठी झाला.

दिव्यांगांच्या जिद्दीला सलाम करत मिरज येथील लेप्रसी हॉस्पिटलने गावातील दिव्यांग आणि त्यांच्या नातेवाईकांना शिलाई प्रशिक्षण देऊन रोजगाराची दिशा दिली. मात्र प्रशिक्षण घेतले तरी शिलाई मशीन खरेदीसाठी पैसे आणायचे कोठून, असा प्रश्न या दिव्यांगांना पडला आहे. त्यासाठी शासकीय पातळीवर, सामाजिक संघटनांकडून पुढाकार घेण्याची गरज आहे.जिद्दीला पाठबळाची अपेक्षा

बस्तवडेतील दिव्यांगांनी एकत्रित जिद्दीची कहाणी प्रत्यक्षात समाजासमोर आणली. नि:स्वार्थी वृत्तीने केलेले हे काम निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र या संघटनेतील बहुतांश सदस्यांच्या मनात वाहणारी वेदना निराळीच आहे. बहुतांश अपंगांना शासनाकडून तुटपुंजे मानधन मिळू लागले आहे. मात्र त्याव्यतिरिक्त शासनाकडून कोणतीच मदत मिळालेली नाही. दिव्यांगांच्या जिद्दीला पाठबळाची अपेक्षा आहे. 

टॅग्स :SangliसांगलीDisability Development Board, Washimअपंग विकास महामंडळ वाशिम