शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत मनसे पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:23 IST

सांगली : सात वर्षांपासून रिक्त असलेले संपर्क अध्यक्षपद, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून होत असलेले दुर्लक्ष व अन्य कारणांमुळे सांगली जिल्ह्यातील ...

सांगली : सात वर्षांपासून रिक्त असलेले संपर्क अध्यक्षपद, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून होत असलेले दुर्लक्ष व अन्य कारणांमुळे सांगली जिल्ह्यातील पाच पदाधिकाऱ्यांनी रविवारी जिल्हाध्यक्षांकडे संयुक्तपणे राजीनामे सादर केले. पक्षात सामान्य कार्यकर्ता म्हणून राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

जिल्ह्यात यापूर्वीच अस्तित्वासाठी झगडत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आता सक्रिय कार्यकर्त्यांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी आहे तेवढी ताकद टिकविण्यासाठी गेल्या काही वर्षांत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. पक्षाकडून कधीही पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना बळ मिळाले नाही. गेल्या सात वर्षांपासून संपर्क अध्यक्षपदही रिक्त आहे. त्यामुळे पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांना नाराजी धुमसत होती.

पक्षांतर्गत नाराजीचा स्फोट रविवारी झाला. जिल्हा उपाध्यक्ष संदीप टेंगले, जिल्हा सचिव आशिष कोरी, महापालिका क्षेत्राध्यक्ष विनय पाटील, सांगली शहराध्यक्ष दयानंद मलपे, कुपवाड शहर सचिव सागर चव्हाण यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्याकडे राजीनामे दिले.

राजीनामा देताना यापुढे सामान्य सैनिक म्हणून पक्षाच्या कार्यात सहभागी होऊ, असे म्हटले आहे. यापूर्वीही अनेकदा मनसेमध्ये पक्षांतर्गत नाराजीचे प्रकार अनेकदा घडले आहेत; पण इतक्या मोठ्या प्रमाणावर राजीनामे देण्याचा प्रकार प्रथमच घडला आहे.

चौकट

सक्रिय पदाधिकारी

राजीनामा दिलेल्यांमध्ये सर्व पदाधिकारी सक्रिय होते. शहरातील अनेक प्रश्नांवर आंदोलने करणे, संघर्ष करणे यांबाबत ते आघाडीवर होते. आशिष कोरी व संदीप टेंगले यांनी पक्षाच्या अस्तित्वाचा झेंडा हाती घेतला होता. या पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिल्याने पक्षाला धक्का बसला आहे.