शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
3
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
5
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
6
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
7
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
8
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
9
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
10
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
11
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
12
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
13
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
14
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
15
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
16
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
17
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
18
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
19
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
20
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण

Vishal Patil :'ज्या दिवशी राजारामबापू वारले त्या दिवशी वाद संपला'; विशाल पाटलांनी इतिहासच सांगितला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 4:41 PM

Jayant Patil Vishal Patil : काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी पहिल्यांदाच भाषणात राजारामबापू आणि वसंतदादा यांच्या वादावर भाष्य केलं आहे.

Jayant Patil Vishal Patil : महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरुन रस्सीखेच सुरू आहे. ठाकरे गटाने पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली असून, आता काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारीवरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विशाल पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर काल जयंत पाटील यांनी भाष्य केले. 

“भाजपाबाबत जनतेच्या मनात संताप, लोकसभेला मविआ ३२ ते ३५ जागा जिंकेल”; जयंत पाटलांचा दावा

काल पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील म्हणाले, 'दादा-बापू हा चाळीस वर्षापुर्वीचा जुना वाद उकरून काढून काही लोक समाज माध्यमातून टीकाटिपणी करून पेटविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र इतिहासातील घटनांचा विचार करून भविष्यातील कल्पनांना मूठमाती देऊ नये या मताचा मी असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. यावर आता काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी प्रत्युत्तर देत आम्ही वाद तेव्हाच संपवल्याचे सांगितले. 

आज विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.आज विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी सांगलीत शक्तीप्रदर्शन केले. यावेळी विशाल पाटील यांनी भाषण केले. यावेळी बोलताना पाटील भावूक झाल्याचे दिसले. 

विशाल पाटील म्हणाले, मी यावेळी ठरवलं कोणाच्या वादात जायचं नाही. काल कोणतर बोललं जुना वाद अजून आहे. वसंतदादांनी सांगितलं होतं की, ज्या दिवशी राजारामबापू वारले त्या दिवशी वाद संपला. आमच्या दृष्टीने ज्या दिवशी राजारामबापू वारले त्या दिवशी वाद संपलेला आहे, तुमच्या मनात अजून वाद असेल तर तो तुम्ही संपवावा. आमच्याकडून यापुढे वादाची भावना असणार नाही', असंही विशाल पाटील म्हणाले. 

"आम्ही आज येत असताना राजारामबापू यांच्या पुतळ्याला नमन करुन आशिर्वाद घेऊन मंचावरसुद्धा त्यांचा फोटो लावून आम्ही या ठिकाणी प्रचाराला शुभारंभ केला आहे. हा वाद मिटल्याचे विशाल पाटील यांनी सांगितले. 

चंद्रहार पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर 

काल ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील  यांनी उमेदवारीवरुन विशाल पाटील यांच्यावर टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना पाटील म्हणाले, काल कोणीतरी आरोप केला शेतकऱ्याचा मुलगा खासदार झालेला पाहवत नाही का? या वसंतदादा घराण्याने शेतकऱ्यांच्या मुलांना पद द्यायचं काम केलं आहे. आमचीही तिच भावना आहे की शेतकऱ्याच्या मुलानं आमदार, खासदार झालं पाहिजे. पण, शेतकऱ्याच्या मुलाला फसवून बळी त्याचा बळी नाही गेला पाहिजे ही सुद्धा पाहायची आमची जबाबदारी आहे, असा टोला विशाल पाटील यांनी लगावला.

'त्या पैलवानांना माझी विनंती आहे, राऊत साहेब आधीच येऊन गोंधळ घालून गेलेत. सांगली सुसंस्कृत आहे इथं भाषा शोभणारी बोलावी, आपल्यावर खूप चांगले संस्कार आहेत. त्यांच्या पुस्तकातील शब्द आणि भावना वापरुन लोक आणि चिडीला पेटतील त्यामुळे आता राजकारण करायचं असेल तर भाषा संभाळून करायची. ज्या शिवसेनेला आवाज वसंतदादांनी घडवला, तोच आवाज आता त्याच वसंतदादांच्याविरोधात वापरला जातोय हे दुर्दैवी आहे, पण आम्हाला याचं भान आहे ही लढाई भाजपाविरोधात आहे आपल्या एकमेकांच्याविरोधात नाही, म्हणून आम्ही भाजपचा पराभव झाला पाहिजे या हेतून एकत्र आलो आहोत, असंही विशाल पाटील म्हणाले.  (Sangli Lok Sabha Election 2024)

टॅग्स :sangli-pcसांगलीJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४vishal patilविशाल पाटीलmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४