शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
3
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
4
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
5
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
7
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
10
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
11
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
12
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
13
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
14
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
15
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
16
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
17
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
18
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
19
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
20
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ११० गावांत एकच गणपती!

By admin | Updated: September 18, 2015 23:10 IST

संख्या घटली : ‘तंटामुक्ती’चे बक्षीस पटकाविल्यानंतर उपक्रमाचा विसर

सचिन लाड -- सांगली  जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा राबवित असलेल्या ‘एक गाव एक गणपती’ या उपक्रमास यावर्षी अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील ७१९ पैकी केवळ ११० गावांनी एकत्रित येऊन ‘एक गाव एक गणपती’ बसविला आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाचे बक्षीस घेतल्यानंतर अनेक गावांना या उपक्रमाचा विसर पडल्याने, संख्या घटल्याचे चित्र आहे. पोलिसांनी प्रयत्न करुनही गावे या उपक्रमात सहभागी होत नाहीत. गणेशोत्सवातील खर्च कमी व्हावा, वर्गणीची कोणावर सक्ती होऊ नये, लोकवर्गणीतून जमा झालेली रक्कम गावाच्या विधायक कामासाठी खर्च व्हावी, गाव म्हटले की गट-तट आले, यातून गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकीत मारामारी होऊ नये, पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण कमी व्हावा, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, पोलीस ठाण्यापासून अनेक गावे २५ ते ३० किलोमीटरवर आहेत, एखादा अनुचित प्रकार घडला तर तिथे पोलिसांना पोहोचण्यास किमान अर्धा तास तरी लागतो. यासाठी पंधरा वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासन व पोलिसांनी पुढाकार घेऊन ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम सुरु केला. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छताअभियान व महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरु झाल्यानंतर या उपक्रमाचा अनेक गावांनी स्वीकार केला. मात्र बक्षीस घेतल्यानंतर अनेक गावे उपक्रमातून बाहेर पडली असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. गतवर्षी १४० गावांतील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन ‘एक गाव एक गणपती’ बसविला होता.दुष्काळग्रस्तांकडे पाठजिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. जमा झालेल्या वर्गणीतील निधी दुष्काळग्रस्तांना देण्याची विनंती करण्यात आली होती. पण याकडे अनेक मंडळांनी पाठ फिरविली असल्याचे दिसून येते. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मंडळे पुढे आली असती, तर ‘एक गाव एक गणपती’ मोहीम राबविणाऱ्या गावांची संख्या वाढली असती. योजनेची आकडेवारी...वर्षगावांची संख्या २००५ ७६२००६ ८५२००७ १४५२००८ ३३४२००९ २४५२०१० ३०२२०११ १९४२०१२ २०५२०१३ १५१२०१४ १२४२०१५ ११०जिल्ह्यात ‘एक गाव एक गणपती’ व्हावा, यासाठी जत, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यातील ग्रामस्थांच्या बैठका घेऊन आवाहन केले होते. दुष्काळजन्य स्थिती असल्याने खर्च कमी करावा. गणेशोत्सवासाठी जमा झालेला पैसा दुष्काळग्रस्तांना देण्याऐवजी गावपातळीवर शेततळी कामासाठी वापरता आला असता.- शेखर गायकवाड, जिल्हाधिकारीगावपातळीवर राजकारण व गट-तट बाजूला ठेवले, तर ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम शंभर टक्के यशस्वी होऊ शकतो. पण पोलीस व प्रशासनाकडून जनजागृती कमी पडत आहे. लोकवर्गणीचा वापर गावाच्या विधायक कामासाठी होऊ शकतो. बक्षीस मिळविण्यापुरते एकत्रित न येता सातत्य ठेवावे.- अ‍ॅड. अमित शिंदे, सांगली जिल्हा सुधार समिती