शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

एकलकोंडेपणा, संवादातील दरी बिघडवू शकते मानसिक स्वास्थ्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाचा संसर्ग वाढला आणि प्रत्येकाच्या दैनंदिन आयुष्याला कलाटणी मिळाली. वर्ष सहा महिन्यात कोरोनाचे हे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोनाचा संसर्ग वाढला आणि प्रत्येकाच्या दैनंदिन आयुष्याला कलाटणी मिळाली. वर्ष सहा महिन्यात कोरोनाचे हे संकट सरेल असे वाटत असतानाही गेल्या दीड वर्षापासून कोरोना आपल्या मानगुटीवर कायम आहे. याचमुळे सर्वसामान्य व्यवहारही बदलल्याने संवादाची दरी वाढतच चालली आहे. यातून एकलकोंडेपणा वाढत अनेकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. त्यामुळे संवाद वाढवा, मित्र, नातेवाईकांच्या संवादात राहा आणि निरोगी राहा असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात.

शाळा, महाविद्यालये बंद असल्याने तरुणांना बाहेर पडता येत नाही. यामुळे घरातच असलेले अनेक जणांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे स्वत:ला एकटे ठेवण्यापेक्षा कोराेनाविषयक नियम पाळून संवाद वाढविणे हाच यावरील महत्त्वाचा उपाय आहे. सोशल मीडियावर इमोजीतून व्यक्त होण्याऐवजी प्रत्यक्ष संवादावर भर दिल्यास तणाव कमी होण्यास मदत होणार आहे.

चौकट

मन हलके करणे हाच उपाय

* घरात असताना, केवळ मोबाईल घेऊन बसण्यापेक्षा कुटुंबातील इतर सदस्यांशी संवाद साधा, विविध विषयावर बोलत राहा.

* आपल्याला आवडीचे असलेल्या विषयावर चर्चा करा किंवा त्यातच अधिकवेळ आपला वेळ घालवा.

* हलके फुलके व ज्यातून कोणताही तणाव येणार नाही अशाच विषयावर चर्चा करा किंवा विचार करा.

* वेळ मिळाल्यानंतर मित्रांशी संवाद साधा, नातेवाईकांना आवर्जून कॉल करा.

चाैकट

मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात...

मानवी संवाद हा कोणत्याही मानसिक ताणावरील प्रभावी उपाय आहे. त्यामुळे एकटे राहून वेळ घालविण्यापेक्षा संवाद साधत राहिल्यास एकटेपणाची सवय लागणार नाही आणि संवादातून मनही हलके होण्यास मदत होईल.

डॉ. चारुदत्त कुलकर्णी, मानसोपचारतज्ज्ञ

कोट

सोशल मीडियाचा वाढता वापर, मुलांमध्ये ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली वाढलेला मोबाईलचा वापर यामुळे संवाद कमी झाला आहे. यात पालकांची भूमिका महत्त्वाची असून त्यांनी स्वत:हून आपल्या पाल्यांशी त्यांच्या आवडीच्या विषयावर संवाद साधून वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा.

पूनम गायकवाड, मानसोपचारतज्ज्ञ