शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

माधवनगर योजनेबाबत शासनाचा दुजाभाव

By admin | Updated: November 21, 2014 00:30 IST

संघर्ष संपणार कधी : स्वच्छ व पुरेशा पाण्यासाठी आंदोलनाची वेळ

गजानन साळुंखे - माधवनगर -मिरज तालुक्यातील माधवनगर नळपाणी पुरवठा योजना मोडकळीस येण्यास थकबाकीबरोबरच शासन यंत्रणेचा दुजाभावही कारणीभूत असल्याने, सातही गावांमधील ग्रामस्थांना पाण्यासाठी वीस वर्षांपासून संघर्ष करावा लागत आहे. नियमित व स्वच्छ पिण्याचे पाणी मिळविण्याच्या मूलभूत हक्कासाठी ग्रामस्थ आता आंदोलनाची भाषा करू लागले आहेत.विविध कारणांनी माधवनगर पाणी योजना सातत्याने बंद पडत आहे. वीज बिल आणि पाणी गळती यावर होणाऱ्या खर्चामुळे ग्रामपंचायती वैतागल्या आहेत. जमा आणि खर्च यांचा मेळ घालण्यात या पदाधिकाऱ्यांचा वेळ जात असल्याने इतर विकास कामांकडे दुर्लक्ष होत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास काही दिवसांत ही योजना कायमस्वरुपी बंद पडण्याची शक्यता आहे. या योजनेवर ग्रामपंचायतीकडून केला जाणारा खर्च आवाक्याबाहेर आहे. जिल्ह्यातील इतर पाणी योजना आणि माधवनगर यांच्यात भेदभाव केला जात आहे. सक्षम नेतृत्वाअभावी या योजनेचे वास्तव जिल्हापातळीवर मांडले जात नाही. यामुळे प्रशासनही या गावावर अवास्तव नियम शिखर समितीच्या माध्यमातून लावत आहे. ही योजना जिल्हा परिषदेने चालविणे आणि सर्व गावांनी वेळेत पाणीपट्टी पूर्णपणे भरणे, हा या योजनेसाठी अंतिम उपाय आहे. पण जि. प. प्रशासन मात्र याबाबत उदासीन आहे. वीस वर्षांपूर्वी या सर्व गावांनी पाण्यासाठी प्रचंड संघर्ष केला होता. आता पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थ रस्त्यावर येऊन संघर्ष करू लागले, तर प्रशासनाला परिस्थिती हाताळणे अवघड होईल. त्यामुळे दुजाभाव सोडून, माधवनगर योजनेसाठी कायमस्वरुपी उपाययोजना जि. प. करणार का? हा प्रश्न आहे. (समाप्त)माधवनगर पाणी योजना पूर्ववतबुधगाव-माधवनगरसह सात गावच्या प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेतून तब्बल नऊ दिवसानंतर पाणीपुरवठा सुरू झाला. पंधरा लाखांच्या थकित वीजबिलापैकी ११ लाख ५३ हजार रुपये भरल्यानंतर खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. थकित रकमेपैकी बुधगाव ग्रामपंचायतीने सर्वाधिक २ लाख ५ हजार, कवलापूरने २ लाख, माधवनगरने १ लाख २३ हजार, तर बिसूर ग्रामपंचायतीने १ लाख २३ हजार रुपये भरले. योजनेच्या शिल्लक रकमेतून प्रादेशिक नळपाणी पुरवठा विभागाने ५ लाख २५ हजार भरल्याने नऊ-दहा दिवसांनंतर पाणी मिळणार आहे.