शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
3
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
4
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
5
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
6
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
7
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
8
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
9
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
10
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
11
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
12
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
13
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
14
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
15
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
16
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
17
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
18
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
19
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
20
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
Daily Top 2Weekly Top 5

खानापूर-आटपाडीच्या कोंडीवर अपक्षाचा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 23:46 IST

श्रीनिवास नागे शिराळ्यात सत्यजित देशमुखांनी भाजपप्रवेश केल्यानं तिथला काँग्रेस पक्षच संपला, तर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला खानापूर-आटपाडीत काँग्रेसला नेते-कार्यकर्ते शोधावे ...

श्रीनिवास नागेशिराळ्यात सत्यजित देशमुखांनी भाजपप्रवेश केल्यानं तिथला काँग्रेस पक्षच संपला, तर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला खानापूर-आटपाडीत काँग्रेसला नेते-कार्यकर्ते शोधावे लागण्याची वेळ आलीय.विट्याचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी दोन वर्षांपूर्वीच पक्षाचं प्रदेश उपाध्यक्षपद सोडलं. तेव्हापासून त्यांची वाटचाल काँग्रेसपासून फटकून, तर भाजपशी लगट करत सुरू असलेली दिसतेय. सदाभाऊ पाटील म्हणजे राजकारणातलं बडं प्रस्थ. विटा शहरावर यांचं वर्षानुवर्ष प्राबल्य. तिथल्या नगरपालिकेची सत्ता चाळीस वर्षे घरात. वडील आमदार होते, हेही २००४ मध्ये आमदार बनले. नंतर काँग्रेसचे सहयोगी आमदार होत थेट पक्षामध्ये गेले. २००९मध्ये पुन्हा आमदार झाले. पण काँग्रेस-राष्टÑवादीमधली गटबाजी उफाळून येत राहिली. काँग्रेसमधल्या कदम गटाचा आणि राष्टÑवादीतल्या आर. आर. पाटील गटाचा अनिल बाबर यांना पाठिंबा असायचा. बाबर म्हणजे सदाभाऊंचे कट्टर विरोधक.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सदाभाऊ पाटील यांनी लाथाळ्यांना कंटाळून भाजपच्या संजयकाका पाटील यांच्या कमळाचा प्रचार केला. काकांना ‘लीड’ मिळालं आणि दोघांचा दोस्तानाही जमला! कदम आणि आर. आर. पाटील हे दोन्ही गट काकांचे विरोधक असल्यानं सदाभाऊ आणि काकांची दोस्ती गहरी बनली. विधानसभेला काँग्रेस, राष्टÑवादी, भाजप, शिवसेना स्वतंत्र लढले. काँग्रेसकडून सदाभाऊ पाटील, राष्टÑवादीकडून आटपाडीचे अमरसिंह देशमुख, भाजपकडून गोपीचंद पडळकर, तर शिवसेनेकडून अनिल बाबर. बाबर यांनी निवडणुकीआधीच राष्टÑवादी सोडली होती. चौघांच्या मताची वाटणी झाली आणि बाबर निवडून आले. सदाभाऊंची पक्षात घुसमट सुरूच होती. शिवाय काकांशी हातमिळवणी झाली होती. अखेर त्यांनी पक्षाच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामाच देऊन टाकला, पण पक्ष सदस्यत्व कायम होतं. नंतर ते अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्याच पक्षीय कार्यक्रमांत दिसले. पक्षानं मात्र ते आपल्यातच असल्याची समजूत करून घेतली.आताच्या लोकसभेला संजयकाका आणि अनिल बाबर यांचं सूत जुळल्याचं सांगण्यात आलं. बाबर यांनी विधानसभेची गणित जुळवण्यासाठी काकांचा प्रचार केला. त्यांची शिवसेनेपेक्षा भाजपशी जास्त जवळीक वाढली.सदाभाऊंच्या भूमिकेबाबत मात्र संभ्रम कायम राहिला. त्यांनी लोकसभेला नेमका कोणाला हात दिला, हे गुलदस्त्यातच राहिलं. ही मुरब्बी राजकारण्याची खेळी होती. त्यामुळंच भाजपला सोडचिठ्ठी देऊन वंचित बहुजन आघाडीकडून लढणारे गोपीचंद पडळकर त्यांच्या मांडीला मांडी लावून बसू लागले आणि संजयकाकांच्या साक्षीनं मुख्यमंत्री त्यांना मुंबईत बोलावू लागले! आटपाडीच्या देशमुख गटाशीही त्यांच्या चर्चेच्या फेऱ्या होऊ लागल्या. विशेष म्हणजे सदाभाऊंनी काँग्रेसच्या नेत्यांनाही तेवढ्याच अंतरावर ठेवलंय.काँग्रेसची पडझड होत असताना राजकीय अपरिहार्यता ओळखून सदाभाऊंनी काँग्रेसचं तिकीट मागितलं नाही आणि नको म्हणूनही सांगितलं नाही! काँगे्रसकडून लढण्यापेक्षा अपक्ष म्हणून लढण्याकडं त्यांचा कल जास्त दिसतोय... देशमुख गटाच्या भाजपमध्ये जाण्यानं राष्टÑवादीही पुरती संपून गेलीय. काँग्रेससारखीच ती कशीबशी तग धरून आहे.जाता-जाता : खानापूर मतदारसंघ तीन भागांमध्ये वाटला गेलाय. खानापूर आणि आटपाडी हे दोन तालुके, अधिक तासगाव तालुक्यातली एकवीस गावं. ग्रामीण भागात अनिल बाबर यांचा यांचा वट कायम राहिलाय. आता मात्र समीकरणांची उलथापालथ होत असताना त्यांची जिरवण्यासाठी विरोधक एकत्र येताहेत. पण मैदानात नेमकं कोण उतरणार, हेच ठरलेलं नाही. सदाभाऊ, पडळकर आणि देशमुख एकत्र आले तर बाजी उलटवू शकतात, हे तिघांनाही माहीत आहे... आणि हेच या कोंडीचं कारण बनलंय. लोकसभेला ताकद दाखवल्यानंतर गोपीचंद पडळकर आता विधानसभेलाही उतरताहेत. तशी घोषणाच त्यांनी केलीय. पण कोठून, हे अद्याप स्पष्ट नाही, तर अमरसिंह देशमुखांनीही भाजप-शिवसेना युतीला फाट्यावर मारत ‘कोणी थांबायचं हे ठरवावं लागंल’ असं सांगत शड्डू ठोकलाय. बाबरविरोधकांतल्या कुठल्या पैलवानाच्या अंगाला तेल लागणार, की सगळेच लांग चढवणार, हेच समजत नाही.ताजा कलम : युती-आघाडी होणार की नाही, याकडं सर्वाधिक लक्ष याच मतदारसंघाचं लागलंय. भाजप-शिवसेना स्वतंत्र लढले तर सदाभाऊ भाजपचेही उमेदवार होऊ शकतात, हे जाणून बाबर यांनी भाजपला हाताशी धरलंय. युती झाली तर सदाभाऊ अपक्ष म्हणून लढावेत आणि त्यांना पडळकर-देशमुखांची मदत देऊन, आपलीही रसद पुरवायची. मग नंतर आपल्या तंबूत घ्यायचं, अशीही खेळी भाजप खेळेल... त्यांचा काय नेम!