शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन नकोच, कडक निर्बंध घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनातून बचावासाठी लॉकडाऊन पर्याय नाही. कडक निर्बंध घालून व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोनातून बचावासाठी लॉकडाऊन पर्याय नाही. कडक निर्बंध घालून व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावेत. शंभर टक्के लसीकरण झाले पाहिजे आणि सर्व रुग्णांवर मोफत उपचार झाले पाहिजेत. सर्व रुग्णालये ताब्यात घेऊन तेथे महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना सुरू करा, अशी मागणी सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत करण्यात आली.

शासन आणि जिल्हा प्रशासन लॉकडाऊन करण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी सर्वपक्षीय कृती समितीची बैठक झाली. यावेळी कॉ. उमेश देशमुख, सतीश साखळकर, डॉ. संजय पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, हमाल संघटनेचे विकास मगदूम, असिफ बावा, नगरसेवक संतोष पाटील, अमर पडळकर, युवराज बावडेकर, शंभूराज काटकर, संदीप टेंगले, दादासाहेब बंडगर, रेखा पाटील, अतुल माने, अभिजित भोसले, प्रशांत भोसले, ऋषिकेश पाटील, मयूर घोडके, तानाजी रुईकर, माधुरी वसगडेकर आदी उपस्थित होते.

या बैठकीस उपस्थित सर्वच कार्यकर्त्यांनी लॉकडाऊनला तीव्र विरोध केला. लॉकडाऊन हा कोरोनावरील उपाय नाही. समूह संसर्गाचा दृष्टिकोनातून मागच्या वेळेस केलेला लॉकडाऊन आरोग्य सुविधा निर्माण करण्याकरता, त्यासाठी आवश्यक ती बेड संख्या वाढवण्याकरता, व्हेंटिलेटर किंवा इतर सुविधा वाढवण्याकरता उपयोगाचा होता. गेल्या वर्षभरात झालेल्या आरोग्यसुविधांचा सध्याच्या परिस्थितीत वापर करण्याची गरज आहे. गरज पडल्यास आणखी कठोर निर्बंध घालून सर्व व्यवसाय सुरू ठेवावेत. लॉकडाऊन केल्यास सामान्यांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे, असा सूर उमटला.

चौकट

जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय कृती समितीची बैठक बोलवावी. रोजगारासह अन्य प्रश्न त्यांच्यासमोर मांडता येतील. रेशनिंग, दैनंदिन गरजा, वीज बिल यावरील चर्चेसह अन्य कर माफ करण्याबाबत विचारविनिमय करता येईल, अशी मागणी झाली.

चौकट

शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार कापा

लॉकडाऊनची झळ गोरगरीब जनतेला बसते. रिक्षावाले, हातगाडीवाले, भाजी विक्रेते आदींसह गोरगरिबांना दोन वेळचे अन्नही मिळत नाही. या काळात शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार मात्र सुरू असतात. त्यांचा पगार कापा म्हणजे गोरगरीब जनता कशी जगते, त्याचे भान येईल, असे माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले.