शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

प्रेमाचं नातं आधीसारखंच कायम ठेवायचंय? करु नका या ५ तक्रारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 13:34 IST

प्रेमाचं नातं आधी जसं होतं तसंच उत्साही आणि प्रेमाचं रहावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण नातं त्यांना हवं तसं ठेवण्यासाठी काय करावं लागतं याचा विचारच करत नाही.

(Image Credit : The Independent)

प्रेमाचं नातं आधी जसं होतं तसंच उत्साही आणि प्रेमाचं रहावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण नातं त्यांना हवं तसं ठेवण्यासाठी काय करावं लागतं याचा विचारच करत नाही. पती-पत्नी, गर्लफ्रेन्ड-बॉयफ्रेन्डमध्ये छोटे छोटे वाद होत असतात. पण कधी कधी परिस्थिती एकसारखी नसते. त्यामुळे तुमचं हे प्रेमाचं नातं तुम्हाला तसंच कायम ठेवायचं असेल तर काही टिप्स आम्ही तुम्हाला देत आहोत. खालील काही तक्रारी आम्ही तुम्हाला सांगत आहोत ज्यामुळ नात्यात अडचणी वाढू शकतात. वेळ काळ पाहून त्या टाळल्या आणि एकमेकांना समजून घेतलं तर तुमचं प्रेम तसंच कायम ठेवण्यास मदत होईल.

१) तू बदललास

लग्नाच्या किंवा प्रेमाच्या सुरुवातीच्या काळात खूपसारं मिळणारं प्रेम काही वर्षांनी कमजोर होऊ लागतं. लग्नानंतर घरातील वाढत्या जबाबदाऱ्या खांद्यावर येऊ लागतात आणि त्यामुळे एकमेकांना पुरेसा वेळ न देऊ शकणे यामुळे कपल्समध्ये अनेकदा वाद होतात. पण परिस्थिती समजून घेतली तर ही समस्या उद्भवणार नाही. 

२) तुझं आता प्रेमच नाहीये

लग्नाच्या काही वर्षांनंतर परिस्थिती बदलते त्यामुळे आधीसारखं प्रेम नसल्याची तक्रार काही लोक करु लागतात. जोडीदार आता आधीसारखं प्रेम करत नाही असा त्यांचा समज होतो. पण एकसारखं प्रेम सतत राहूच शकत नसतं. काही वर्षांनी त्यात बदल होतोच. प्रेम असतंच फक्त ते व्यक्त करण्याच्या पद्धती बदललेल्या असतात. 

३) तुझ्याकडून अपेक्षा करणे चुकीचेच

प्रत्येक पती-पत्नींमध्ये बघायला मिळणारी ही कॉमन तक्रार आहे. कारण पती-पत्नींच्या एकमेकांकडून प्रमाणापेक्षा जास्त अपेक्षा असतात. यात महिला पुरुषांपेक्षा अधिक पुढे असतात. अपेक्षा ठेवणे चुकीचे नाही पण त्याचं प्रमाण हे ठरवायला हवं.  

४) तुला तर माझी नेहमीच अडचण होते

हे नेहमीच पाहिलं जातं की, पती-पत्नींमध्ये लग्नाच्या काही वर्षांनी वाद अधिक वाढत जातात. कारण आता महिलाही घरातील, बाहेरील, ऑफिसची सगळी कामे करतात. प्रत्येक पतीलाही हेच वाटत असतं की, त्याच्या पत्नीला सगळी कामे यावीत किंवा तिलाही सर्व व्यवहार करता यावेत. पण घराचा विषय येतो तेव्हा पतीला पत्नी ही त्यांच्या आईसारखी किंवा आजीसारखी रहावी असं वाटत असतं. 

५) तू मला सुखाने जगू का देत नाहीस?

लग्नाच्या काही वर्षांनी ही तक्रार बहुतेक पुरुष करु लागतात. त्यांना वाटत असतं की, पत्नीने त्यांच्या प्रत्येक गोष्टीत लुडबूड करु नये. लग्नाआधी होतं तसं स्वातंत्र्य त्यांना हवं असतं. पण लग्नानंतर परिस्थिती बदललेली असते त्यामुळे या गोष्टीही बदलणे स्वाभाविक आहे. पण पत्नीने त्यांना एखाद्या गोष्टीवरुन टोकलं तर दोघांमध्ये भांडणं होतात. मुळात दोघांचा संसार हा दोघांनी समजून घेऊन चालवायचा असतो. त्यात तिसरं काहीच करु शकत नाही. वाद करण्यापेक्षा दोघांनीही वेळ-काळ पाहून वागलं तर या समस्या निर्माणच होणार नाहीत. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टmarriageलग्न