शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

प्रेमाचं नातं आधीसारखंच कायम ठेवायचंय? करु नका या ५ तक्रारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 13:34 IST

प्रेमाचं नातं आधी जसं होतं तसंच उत्साही आणि प्रेमाचं रहावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण नातं त्यांना हवं तसं ठेवण्यासाठी काय करावं लागतं याचा विचारच करत नाही.

(Image Credit : The Independent)

प्रेमाचं नातं आधी जसं होतं तसंच उत्साही आणि प्रेमाचं रहावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण नातं त्यांना हवं तसं ठेवण्यासाठी काय करावं लागतं याचा विचारच करत नाही. पती-पत्नी, गर्लफ्रेन्ड-बॉयफ्रेन्डमध्ये छोटे छोटे वाद होत असतात. पण कधी कधी परिस्थिती एकसारखी नसते. त्यामुळे तुमचं हे प्रेमाचं नातं तुम्हाला तसंच कायम ठेवायचं असेल तर काही टिप्स आम्ही तुम्हाला देत आहोत. खालील काही तक्रारी आम्ही तुम्हाला सांगत आहोत ज्यामुळ नात्यात अडचणी वाढू शकतात. वेळ काळ पाहून त्या टाळल्या आणि एकमेकांना समजून घेतलं तर तुमचं प्रेम तसंच कायम ठेवण्यास मदत होईल.

१) तू बदललास

लग्नाच्या किंवा प्रेमाच्या सुरुवातीच्या काळात खूपसारं मिळणारं प्रेम काही वर्षांनी कमजोर होऊ लागतं. लग्नानंतर घरातील वाढत्या जबाबदाऱ्या खांद्यावर येऊ लागतात आणि त्यामुळे एकमेकांना पुरेसा वेळ न देऊ शकणे यामुळे कपल्समध्ये अनेकदा वाद होतात. पण परिस्थिती समजून घेतली तर ही समस्या उद्भवणार नाही. 

२) तुझं आता प्रेमच नाहीये

लग्नाच्या काही वर्षांनंतर परिस्थिती बदलते त्यामुळे आधीसारखं प्रेम नसल्याची तक्रार काही लोक करु लागतात. जोडीदार आता आधीसारखं प्रेम करत नाही असा त्यांचा समज होतो. पण एकसारखं प्रेम सतत राहूच शकत नसतं. काही वर्षांनी त्यात बदल होतोच. प्रेम असतंच फक्त ते व्यक्त करण्याच्या पद्धती बदललेल्या असतात. 

३) तुझ्याकडून अपेक्षा करणे चुकीचेच

प्रत्येक पती-पत्नींमध्ये बघायला मिळणारी ही कॉमन तक्रार आहे. कारण पती-पत्नींच्या एकमेकांकडून प्रमाणापेक्षा जास्त अपेक्षा असतात. यात महिला पुरुषांपेक्षा अधिक पुढे असतात. अपेक्षा ठेवणे चुकीचे नाही पण त्याचं प्रमाण हे ठरवायला हवं.  

४) तुला तर माझी नेहमीच अडचण होते

हे नेहमीच पाहिलं जातं की, पती-पत्नींमध्ये लग्नाच्या काही वर्षांनी वाद अधिक वाढत जातात. कारण आता महिलाही घरातील, बाहेरील, ऑफिसची सगळी कामे करतात. प्रत्येक पतीलाही हेच वाटत असतं की, त्याच्या पत्नीला सगळी कामे यावीत किंवा तिलाही सर्व व्यवहार करता यावेत. पण घराचा विषय येतो तेव्हा पतीला पत्नी ही त्यांच्या आईसारखी किंवा आजीसारखी रहावी असं वाटत असतं. 

५) तू मला सुखाने जगू का देत नाहीस?

लग्नाच्या काही वर्षांनी ही तक्रार बहुतेक पुरुष करु लागतात. त्यांना वाटत असतं की, पत्नीने त्यांच्या प्रत्येक गोष्टीत लुडबूड करु नये. लग्नाआधी होतं तसं स्वातंत्र्य त्यांना हवं असतं. पण लग्नानंतर परिस्थिती बदललेली असते त्यामुळे या गोष्टीही बदलणे स्वाभाविक आहे. पण पत्नीने त्यांना एखाद्या गोष्टीवरुन टोकलं तर दोघांमध्ये भांडणं होतात. मुळात दोघांचा संसार हा दोघांनी समजून घेऊन चालवायचा असतो. त्यात तिसरं काहीच करु शकत नाही. वाद करण्यापेक्षा दोघांनीही वेळ-काळ पाहून वागलं तर या समस्या निर्माणच होणार नाहीत. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टmarriageलग्न