शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

येरडव जलस्वराज्य योजनेचे वाजले तीनतेरा

By admin | Updated: September 16, 2014 23:22 IST

ग्रामस्थ तहानलेलेच : अद्याप पाणी नसल्याने घसा कोरडा

पाचल : राजापूर तालुक्यातील येरडव गावच्या जलस्वराज्य प्रकल्पाचे तीनतेरा वाजले आहेत. गेल्या ७ ते ८ वर्षांपासून हा जलस्वराज्य प्रकल्प कागदोपत्री पूर्ण आहे. मात्र, वस्तुस्थिती वेगळी आहे. तालुक्यातील प्रथम प्रकल्प म्हणून याची नोंद आहे. यावर शासनाने १८ लाख खर्च करुन आपले धोरण बजावले असतानासुद्धा येथील ग्रामस्थांनी १० टक्के लोकवाटा वर्गणी काढली. तरीही पाणी का नाही? असा ग्रामस्थ सवाल करत असताना जलस्वराज्यच्या समितीने आपल्या अनुषंगाने त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आहे.त्यामुळे पाणी आपल्याला आता मिळणार नाही, याची खात्री या ग्रामस्थांना पटली आहे. अनेकवेळा या विषयांवर चर्चा होऊनही परिस्थिती जैसे थे आहे.येरडव - मुंबई मंडळाने दिलेल्या सहकार्याची न मिळालेली पोचपावती, समितीतल्या सदस्यांचा गैरसमज, ठेकेदाराने केलेल्या कामाचे मुल्यांकन न केल्यामुळे, गंजलेले पाईप, बंद पडलेला विद्युत पंप, महावितरण कंपनीने कापलेली वीजजोडणी यामुळे हा प्रकल्पाचे पाणी ग्रामस्थांना उपलब्ध होत नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले. यावर बऱ्याचवेळा तोडगा काढण्यात आला. पण अंमलबजावणी कोण करतोय? शासनाचा १८ लाख रुपयांचा निधी खर्च होऊन त्यावर ग्रामस्थांनी दिलेल्या १० टक्के वर्गणीनेही पाणी मिळत नसेल तर या जलस्वराज्य समितीचा आम्हाला काय उपयोग? असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत. याविषयी सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात काही योजनांबाबत अनेकवेळा चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली मात्र या मागणीकडे लक्ष देण्यात आले नाही. येरडव येथील योजनेच्या कामात अनेक व्यवहार संशयास्पद स्थितीत असून जलस्वराज्य योजनेद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा हा हेतू डोळ््यासमोर ठेवून ही योजना पूर्ण व्हावी अशी मागणी केली होती. मात्र या योजनेचे तीन तेरा वाजले आहेत. (वार्ताहर)