शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
5
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
6
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
7
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
8
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
9
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
10
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
11
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
12
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
13
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
14
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
15
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
16
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
17
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
18
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
19
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
20
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
Daily Top 2Weekly Top 5

येरडव जलस्वराज्य योजनेचे वाजले तीनतेरा

By admin | Updated: September 16, 2014 23:22 IST

ग्रामस्थ तहानलेलेच : अद्याप पाणी नसल्याने घसा कोरडा

पाचल : राजापूर तालुक्यातील येरडव गावच्या जलस्वराज्य प्रकल्पाचे तीनतेरा वाजले आहेत. गेल्या ७ ते ८ वर्षांपासून हा जलस्वराज्य प्रकल्प कागदोपत्री पूर्ण आहे. मात्र, वस्तुस्थिती वेगळी आहे. तालुक्यातील प्रथम प्रकल्प म्हणून याची नोंद आहे. यावर शासनाने १८ लाख खर्च करुन आपले धोरण बजावले असतानासुद्धा येथील ग्रामस्थांनी १० टक्के लोकवाटा वर्गणी काढली. तरीही पाणी का नाही? असा ग्रामस्थ सवाल करत असताना जलस्वराज्यच्या समितीने आपल्या अनुषंगाने त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आहे.त्यामुळे पाणी आपल्याला आता मिळणार नाही, याची खात्री या ग्रामस्थांना पटली आहे. अनेकवेळा या विषयांवर चर्चा होऊनही परिस्थिती जैसे थे आहे.येरडव - मुंबई मंडळाने दिलेल्या सहकार्याची न मिळालेली पोचपावती, समितीतल्या सदस्यांचा गैरसमज, ठेकेदाराने केलेल्या कामाचे मुल्यांकन न केल्यामुळे, गंजलेले पाईप, बंद पडलेला विद्युत पंप, महावितरण कंपनीने कापलेली वीजजोडणी यामुळे हा प्रकल्पाचे पाणी ग्रामस्थांना उपलब्ध होत नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले. यावर बऱ्याचवेळा तोडगा काढण्यात आला. पण अंमलबजावणी कोण करतोय? शासनाचा १८ लाख रुपयांचा निधी खर्च होऊन त्यावर ग्रामस्थांनी दिलेल्या १० टक्के वर्गणीनेही पाणी मिळत नसेल तर या जलस्वराज्य समितीचा आम्हाला काय उपयोग? असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत. याविषयी सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात काही योजनांबाबत अनेकवेळा चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली मात्र या मागणीकडे लक्ष देण्यात आले नाही. येरडव येथील योजनेच्या कामात अनेक व्यवहार संशयास्पद स्थितीत असून जलस्वराज्य योजनेद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा हा हेतू डोळ््यासमोर ठेवून ही योजना पूर्ण व्हावी अशी मागणी केली होती. मात्र या योजनेचे तीन तेरा वाजले आहेत. (वार्ताहर)