शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे रत्नागिरीत कडकडीत शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:23 IST

रत्नागिरी : कोरोनाचे रुग्ण आणि मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने रेड झोनमध्ये समावेश झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यात गुरुवारपासून कडक लॉकडाऊन ...

रत्नागिरी : कोरोनाचे रुग्ण आणि मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने रेड झोनमध्ये समावेश झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यात गुरुवारपासून कडक लॉकडाऊन सुरू झाला आहे. पहिल्याचदिवशी सर्व व्यवहार बंद असल्याने सर्वत्र कडकडीत शांतता होती.

राज्यात १ जूनपासून अनेक जिल्ह्यांना लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्ण सापडण्याचे, रुग्णांचा मृत्यू होण्याचे सरासरी प्रमाण अधिक आहे, अशा जिल्ह्यांचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या २० टक्के सरासरीने कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत; तर ३.२४ च्या सरासरीने कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. जिल्ह्यात दोन्हीचे प्रमाण अधिक असल्याने आठ दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

गुरुवार, दि. ३ ते बुधवार, दि. ९ जूनपर्यंत हा कडक लॉकडाऊन लागू राहणार आहे. या काळात औषध दुकाने वगळता अन्य कोणालाही दुकाने उघडण्यास परवानगी नाही. दुधाची विक्री होम डिलिव्हरी पद्धतीने करावयाची आहे. सरकारी व खासगी प्रवासी वाहतुकीला मनाई करण्यात आली आहे. अंत्यसंस्कार किंवा वैद्यकीय कारणांसाठी प्रवासाला मान्यता असली, तरी त्यासाठी ई-पास अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून रत्नागिरी जिल्हा पूर्ण शांत झाला होता.

पोलीस कर्मचाऱ्यांसह पोलीस मित्र जागोजागी तैनात असून, रस्त्यावरून फिरणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी केली जात आहे. लसीकरणासाठी जाणाऱ्यांकडील संदेश तपासल्याखेरीज त्यांनाही सोडले जात नव्हते. आठ दिवस याच पद्धतीने तपासणी केली जाणार आहे. लोकांनी घरातच थांबून या लाॅकडाऊनला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.