शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांमध्ये समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:23 IST

रत्नागिरी : कोरोनामुळे मृत झालेल्या मात्र सरकारच्या निकषात बसत नसल्यामुळे मदतीपासून वंचित राहिलेल्या एस. टी. कर्मचाऱ्यांच्या वारसांना पाच लाख ...

रत्नागिरी : कोरोनामुळे मृत झालेल्या मात्र सरकारच्या निकषात बसत नसल्यामुळे मदतीपासून वंचित राहिलेल्या एस. टी. कर्मचाऱ्यांच्या वारसांना पाच लाख रूपयांची मदत देण्याची घोषणा परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी केली आहे. त्यामुळे एस. टी. कर्मचाऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

सकारात्मक निर्णयाची अपेक्षा

रत्नागिरी : पदोन्नतीतील आरक्षणाला स्थगिती देणाऱ्या शासन आदेशावर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून, याबाबत सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांना आहे. याप्रकरणी याचिकेवर दि. २१ जून रोजी सुनावणी होणार आहे.

अकरावी प्रवेशाबाबत संभ्रम

रत्नागिरी : अकरावीची प्रवेश प्रक्रिया अनेक फेऱ्यांमध्ये राबवली जाते. मात्र, सीईटी घेतल्यास एक किंवा दोन फेऱ्यांमध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन केले जाणार आहे. त्यामुळे दोन महिने लांबणीवर पडणारी अकरावीची प्रवेश प्रक्रिया काही दिवसात आटोपेल, असा विश्वास होत असला तरी प्रवेश प्रक्रियेबाबत अद्याप संभ्रमावस्थाच आहे.

पाण्याची समस्या मार्गी

चिपळूण : तालुक्यातील माैजे गाणे राजवाडी येथे आमदार शेखर निकम यांच्या निधीतून बोअरवेल बसविण्यात आली आहे. एप्रिल, मे महिन्यात पाण्यासाठी येथील ग्रामस्थांना करावी लागणारी वणवण मात्र थांबली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

पाण्याच्या पातळीत वाढ

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळानंतर जिल्ह्यात काही दिवस पावसाचा मुक्काम राहिल्याने जिल्ह्यातील तीन मध्यम प्रकल्प व ४६ लघु प्रकल्पांमधील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. मात्र, अर्जुना प्रकल्पाची पाणीपातळी गतवर्षीपेक्षा कमी झाली आहे.

रस्त्याची दुरवस्था

रत्नागिरी : तालुक्यातील गोळप दाभिळवाडी ते मोहल्ला या पाच किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे खड्ड्यांतून मार्गक्रमण करणे अवघड बनले आहे. अनेक वर्षे गोळप दाभिळवाडी रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लभ झाल्यामुळे रस्ता निकृष्ट बनला आहे.

वादळग्रस्तांना मदत

राजापूर : काॅंग्रेसचे नेते अविनाश लाड यांनी तौक्ते वादळातील नुकसानग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. युवक काॅग्रेसचे अध्यक्ष नुईद काझी, तालुका उपाध्यक्ष हर्षद मांजरेकर यांनी हे साहित्य गावागावात नेऊन आपतग्रस्तांना वितरीत केले. यावेळी कुवेशीच्या सरपंच मोनिका कांबळे उपस्थित होत्या.

ऑनलाईन परिसंवाद

दापोली : मधमाशांचे सेंद्रिय शेतीतील अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेता, दि. ३ जून रोजी ‘मधुमक्षिका पालनातून वाढवा सेंद्रिय शेतीमध्ये गोडवा’ या विषयावर ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन केले आहे. सेंद्रिय शेती ‘संशोधन व प्रशिक्षण केंद्र’ स्थापन करणे, या प्रकल्पांतर्गत या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

निकष बदलण्याची मागणी

देवरूख : खावटी कर्जाचे निकष बदलून चारपटीने कर्ज देण्याची मागणी रत्नागिरी जिल्हा काॅग्रेसतर्फे काॅंग्रेस उपाध्यक्ष अशोक वालम यांनी केली आहे. प्रत्येक शेतकऱ्याला गतवर्षी घेतलेल्या कर्जाच्या चारपटीने कर्ज मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

नागवेकर यांचा सत्कार

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातील प्रशांत नागवेकर हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे सत्कार करण्यात आला. कार्यकारी अभियंता वृषभ उपाध्ये यांच्या हस्ते नागवेकर यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गाैरविण्यात आले.