शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी नगर परिषदेने दिले कर्मचाऱ्यांना विमा कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 13:21 IST

रत्नागिरी नगर परिषदेचे कर्मचारीही कोरोना युद्धाच्या लढाईत मागे राहिलेले नाही. कोरोनाशी लढण्यासाठी सतत कार्यरत असलेल्या नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेताना रत्नागिरी नगर परिषदेच्या ३९ अधिकारी, कर्मचाऱ्यांना २५ लाखाच्या विम्याचे कवच देण्यात आले आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या लढाईत कर्मचारी कार्यरत, ३९ कर्मचाऱ्यांना लाभविमा कवच देणारी राज्यातील पहिलीच नगर परिषद

रत्नागिरी : कोरोना विषाणूशी लढण्यासाठी सारीच यंत्रणा कार्यरत आहे. रत्नागिरी नगर परिषदेचे कर्मचारीही कोरोना युद्धाच्या लढाईत मागे राहिलेले नाही. कोरोनाशी लढण्यासाठी सतत कार्यरत असलेल्या नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेताना रत्नागिरी नगर परिषदेच्या ३९ अधिकारी, कर्मचाऱ्यांना २५ लाखाच्या विम्याचे कवच देण्यात आले आहे.

नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांच्या पुढाकारातून कर्मचाऱ्यांना विमा कवच देण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांचा विमा उतरविणारी रत्नागिरी नगर परिषद राज्यातील पहिली नगर परिषद असल्याचा दावा नगर परिषद प्रशासनाने केला आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाशी लढणाऱ्या आरोग्य, पोलीस, परिचारिका, आशासेविका हे कोरोना योद्धा म्हणून लढत आहेत. त्यांच्याबरोबर नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारीही कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी कर्तव्यावर आहेत. त्यांना या विम्याचे संरक्षण देण्यात आले आहे. नगर परिषदेने एलआयसी या शासनमान्य कंपनीचा ह्यजीवन अमर टर्म इन्शुरन्स विमाह्ण उतरविला आहे. नगर परिषदेतील ३९ अधिकारी, कर्मचाऱ्यांना या विम्याचे कवच मिळाले आहे. विम्याची रक्कम २५ लाख प्रती कर्मचारी आहे.

कोरोना प्रादुर्भाव असेपर्यंत नगर परिषदेतर्फे हे संरक्षण राहणार आहे. त्यासाठी नगर परिषदेतर्फे प्रत्येक वर्षी ७ हजार ७६० हप्ता भरण्यात येणार आहे. याचा एकूण खर्च २ लाख ९९ हजार १३० रुपये एवढा आहे. कोरोनाच्या लढाईत कर्तव्य बजावताना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना २५ लाखाचे विमा कवच पुरविले जाणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuncipal Corporationनगर पालिकाRatnagiriरत्नागिरी