शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
5
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
6
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
7
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
8
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
9
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
10
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
11
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
12
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
13
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
14
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
15
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
16
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
17
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
18
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
19
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
20
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
Daily Top 2Weekly Top 5

रक्षाबंधन..... गोड बंधन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:34 IST

बहीण-भावाचे नाते मायेच्या, प्रेमाच्या धाग्याने घट्ट बांधून ठेवणारा सण अर्थात रक्षाबंधन! भारतीय संस्कृतीमध्ये भैय्यादूज किंवा रक्षाबंधन या नावाने साजरा ...

बहीण-भावाचे नाते मायेच्या, प्रेमाच्या धाग्याने घट्ट बांधून ठेवणारा सण अर्थात रक्षाबंधन! भारतीय संस्कृतीमध्ये भैय्यादूज किंवा रक्षाबंधन या नावाने साजरा करण्यात येतो. हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावासाठी दीर्घायुष्य व सुख लाभो, मिळो म्हणून प्रार्थना करतात. भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे. वास्तविक एकमेकांना जोडणारा असा हा सण आहे. रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे नाती जोडण्यास या सणामुळे समाजास वाव मिळतो. ज्या समाजात अशा प्रकारची एकरूपता, ऐक्य असते, असा समाज सामर्थ्यशाली बनतो हा संदेशही राखी पौर्णिमेद्वारे दिला जाऊ शकतो.

द्रौपदीने आपल्या मानलेल्या भावाला (कृष्णाला) बांधलेली जरतारी शेल्याची चिंधी, गरीब बहिणीने भावाच्या हातात बांधलेला धागा किंवा शाळकरी ताईने तयार केलेली राखी, राजपूत रमणीने बाजूच्या राजाला पाठविलेले राखीचे ताट असो वा श्रीमंत बहिणीने भावाला बांधलेली सोन्याची किंवा चांदीची राखी काय किंवा आज इंटरनेटच्या माध्यमातून बहिणीने भावाला पाठविलेली ई-शुभेच्छापत्रसहित राखी काय, या सर्वांमागे भावना एकच आहे ती म्हणजे भावा-बहिणींचे परस्परांवरील प्रेम. स्त्री कितीही मोठी, मिळवती झाली, तरी तिच्या रक्षणाची जबाबदारी तिच्या भावावरच आहे हेच ती यातून सुचवत असते. यात तिचा दुबळेपणा नसून, भावाच्या कर्तृत्वावरचा विश्वास दिसून येतो. रक्ताचे नाते असणारे भाऊ, बहीण असोत किंवा मानलेले असो, पण या नात्यामागची भावना पवित्र व खरी आहे. त्या नात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणूनच राखी पौर्णिमा साजरी केली जात असावी. त्यामुळेच तर भाऊ नसणारी स्त्री ही चंद्राला आपला भाऊ मानते व त्याला ओवाळते. प्रत्येक आई आपल्या मुलाला चंदामामा म्हणूनच चांदोबाची ओळख करून देते. इंटरनेट, मोबाईल किंवा स्मार्टफोनमुळे जग कितीही जवळ आले असले तरी परगावी राहणाऱ्या भावाला पोस्टाने किंवा कुरिअरने आवर्जून राखी पाठविली जाते.

काळानुरूप रक्षाबंधनाचा सण केवळ कुटुंबीयांपुरता मर्यादित राहिलेला नाही. पर्यावरणप्रेमीही झाडांना राख्या बांधून त्यांच्या ‘जतन व संवर्धनाचा’ संदेश देतात. तसेच शाळांमधून मोठ्या प्रमाणावर राख्या तयार करून त्या देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांनाही पाठविल्या जातात. काही कुटुंबीय किंवा मित्र परिवार कारागृह, मनोरुग्णालय, तसेच बालसुधारगृहे, निरीक्षणगृहे, अनाथाश्रमात जाऊन तेथील मंडळीना राख्या बांधतात. एकूणच ‘सामाजिक बांधीलकी’ जपण्याचे काम केले जाते. काही शाळांतील विद्यार्थिनी पोलीस बांधवांनाही राख्या बांधून सण साजरा करतात.

प्रत्येकाची आवड ही निरनिराळी असते. बाजारात सध्या विविध प्रकारच्या राख्या विक्रीस उपलब्ध आहेत. शहरात राख्यांनी नटली आहेत. काही दुकानदारांनी तर राख्यांचे दालनच उघडले आहे. युवती, महिलांची राख्यांसाठी गर्दी होत असलेली दिसून येते.

ग्रामदैवतचं पोवतं

घरोघरी रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात येत असला तरी ग्रामदेवतेला राखीपौर्णिमेला पोवतं बांधलं जातं. पुजारी पोवती तयार करून ग्रामदेवतेला बांधतात. त्यानंतर घरोघरी ही पोवती वाटण्यात येतात. पुरुष मंडळी पोेवतं हातात बांधतात किंवा गळ्यात घालतात. ग्रामदेवतेला रक्षाबंधनादिवशी पोवतं अर्पण केल्यानंतर हा सण साजरा करण्यात येतो. आजही घरात अधिकच्या राख्या खरेदी करण्यात येतात. त्यातील एक राखी घरातील देव्हाऱ्यात ठेवण्याची प्रथा आहे. नंतरच घरातील मंडळींना राखी बांधली जाते.