शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

आता ऑक्टोबरही होतोय पावसाचा महिना, शेतकऱ्यांचे आणि मच्छिमारांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 11:18 AM

rain, ratnagirinews, farmar गेल्या काही वर्षांपासून परतीच्या पावसाचा मुक्काम लांबत असून, ऑक्टोबर महिन्यातही पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे उर्वरित चार महिन्यांप्रमाणेच ऑक्टोबर महिनाही पावसाचा महिना ठरू लागला आहे. अलिकडच्या काळात पावसाचे वेळापत्रक बदलले आहे. ऑक्टोबर महिन्यात काही दिवस मुसळधार पाऊस झाला असला तरी अतिवृष्टी झालेली नाही.

ठळक मुद्देआता ऑक्टोबरही होतोय पावसाचा महिनायंदा पावसाळ्याच्या सुरूवातीला आणि शेवटीही नुकसान

रत्नागिरी : गेल्या काही वर्षांपासून परतीच्या पावसाचा मुक्काम लांबत असून, ऑक्टोबर महिन्यातही पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे उर्वरित चार महिन्यांप्रमाणेच ऑक्टोबर महिनाही पावसाचा महिना ठरू लागला आहे. अलिकडच्या काळात पावसाचे वेळापत्रक बदलले आहे. ऑक्टोबर महिन्यात काही दिवस मुसळधार पाऊस झाला असला तरी अतिवृष्टी झालेली नाही.कोकणात जून ते सप्टेंबर हे चार महिने पावसाचे आहेत. जून आणि जुलैमध्ये मुसळधार, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये हलक्या सरी, असे कोकणातील पावसाचे वेळापत्रक असते. जून महिन्यात सरासरी ८१८ मिलिमीटर पाऊस पडतो. जुलैमध्ये १२८६ मिलिमीटर सरासरी पाऊस पडतो. मात्र, यावर्षी केवळ ७०७ मिलिमीटर पाऊस झाला. म्हणजेच जुुलैमध्ये केवळ ५५ टक्केच पाऊस झाला. २०१९ आणि २०२० सालच्या या दोन्ही महिन्यांनी निराशाच केली.

ऑगस्ट महिन्यापासून पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते. सप्टेंबर महिन्यात पावसाची परती सुरू होते. मात्र, गेल्या दोन वर्षात ऑगस्ट महिन्यात मुसळधार पाऊस होत असून पावसाचा मुक्काम ऑक्टोबर अखेरपर्यंत लांबत आहे.जानेवारी २०१९ पासून वर्षभरच समुद्रात विविध वादळे येत होती. ऑगस्ट महिन्यात आलेल्या क्यार वादळाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आणि मच्छिमारांचे अतोनात नुकसान केले होते. यावर्षीही ऑक्टोबर महिन्यात पावसाचा मुक्काम वाढला आहे.

बंगालच्या उपसागरात वारंवार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस पडत असल्याचे हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. १३ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत होता. मात्र, अजूनही जिल्ह्यात अतिवृष्टी वा ढगफुटीसारखा पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात १ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत १२५१ मिलिमीटर (सरासरी १३९ मिलिमीटर) पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.यावर्षी केवळ ७८.५६ टक्केयावर्षी जून आणि जुलै महिन्यात पावसाने निराशा केली. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात सातत्य दाखवले असले तरी पावसाच्या चार महिन्यांच्या कालावधीत होणारा सरासरी पाऊस यावर्षी केवळ ७८.५६ टक्के (सरासरी २६४२.८४ टक्के) इतकाच झाला आहे. सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यापासून सातत्याने बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. त्यामुळे आता ऑक्टोबर महिन्यातही पावसाचा मुक्काम वाढू लागला आहे.

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरीFarmerशेतकरी