शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

समाजमंदिरांपेक्षा रुग्णालयांचीच गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:31 IST

सध्या प्रत्येकाच्याच मनात कोरोनाची भीती आहे. स्वत:बरोबरच आपल्या आप्तांचीही काळजी मनात घर करून आहे. दुसरा दिवस उजाडला की काही ...

सध्या प्रत्येकाच्याच मनात कोरोनाची भीती आहे. स्वत:बरोबरच आपल्या आप्तांचीही काळजी मनात घर करून आहे. दुसरा दिवस उजाडला की काही अशुभ वार्ता कानी पडू दे नको, असे भाकीत सारेच ईश्वराकडे करीत आहेत. अर्थात, गेल्या वेळेसारखी ही परिस्थितीही कालांतराने निवळेल. मात्र, यातून ‘आम्ही’ काय शिकलो, यापेक्षा यातून मी काय बोध घेतला, याचा विचार प्रत्येकानेच अंतर्मुख होऊन करायला हवा. कारण आपल्या बेफिकिरीमुळे परिस्थिती भयावह झाली की मग आपण देवा यातून मला वाचव, अशी आळवणी करतो. ती वेळ निघून गेली मग ‘ये रे माझ्या मागल्या...’ उक्तीनुसार पुन्हा तोच बेजबाबदारपणा दाखवतो. त्यामुळे आपल्या या वृत्तीमुळे परिस्थिती अधिकच बिघडत जाते. कोरोनाकाळात दोन वेळा याचा प्रत्यय आला आहे. ज्या देशांनी, राज्यांनी स्वयंशिस्त पाळली, त्यांना काेराेनाशी लढा देणे सोपे झाले. मात्र, बेशिस्तीमुळे काय होते, त्याचा अनुभव सध्या आपण घेतच आहोत.

आजची कोरोना स्थिती नियंत्रणाबाहेरची झाली आहे. आधीच अपुऱ्या असलेल्या आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण आला आहे. आहे तेच डाॅक्टर, परिचारिका आणि अन्य कर्मचारी दोन - तीन शिफ्टमध्ये स्वत:च्या आणि कुटुंबीयांच्या जिवाची पर्वा न करता नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक आपल्या कुटुंबाला विसरून लाेकांच्या सेवेसाठी बाहेर पडत आहेत. प्रसंगी रुग्णांना खाऊपिऊ देत आहेत. सुविधा नाहीत, तिथे आपल्या वाहनातून उचलून नेत आहेत. अशा रुग्णांसाठी, त्यांच्या नातेवाइकांसाठी आरोग्य यंत्रणेबरोबरच हे स्वयंसेवक आज खऱ्या अर्थाने देवदूत बनले आहेत.

वाढती रुग्णसंख्या पाहता, रुग्णालये आणि त्यातील मनुष्यबळ कमी पडत आहे. एरव्ही प्रत्येक समाजाला त्यांची प्रार्थनास्थळे महत्त्वाची वाटतात. माणसांपेक्षा जात, धर्म महत्त्वाचा वाटतो, त्यामुळे काही वेळा एकमेकांच्या जिवावर उठल्याच्या अनेक घटना वाचनात, टीव्हीवर पाहण्यात येतात. परंतु आज हे सगळं फोल ठरलं आहे. आज देव नाही तर देवासारखी माणसं मदतीला धावून येत असल्याने प्राण किती अनमोल असतो, याचा साक्षात्कार नव्याने व्हायला लागलाय. म्हणूनच आतातरी सर्वांनीच देवाच्या, जातीच्या नावाखाली समाजमंदिराचे राजकारण करत लोकांच्या मनात जातीयतेची विषवल्ली पसरविणाऱ्या राजकीय मंडळींचा कावा ओळखून त्यांना समाजमंदिरे उभारण्यापासून रोखून प्रत्येक गावामध्ये अद्ययावत असे रुग्णालय उभारून त्यात पुरेसे मनुष्यबळही उपलब्ध करून देण्याचा आग्रह धरावा. कारण यापुढे रुग्णालयेच कामी येणार आहेत. कोरोनाने हे अंजन डोळ्यात घातले आहे, एवढे नक्की.

डाॅ. गजनान पाटील