शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण कर्मचाऱ्यांनी दिला ‘आशादीप’ला मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:32 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : थकीत वीजबिलांची वसुली करताना कठाेर पावले उचलणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीही जपण्याचे काम केले ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : थकीत वीजबिलांची वसुली करताना कठाेर पावले उचलणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीही जपण्याचे काम केले आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने पैसे जमा करून त्यातून विशेष मुलांसाठी कार्यरत असलेल्या येथील आशादीप संस्थेला लाेखंडी कपाट भेट स्वरूपात दिले आहे. या मदतीमुळे आशादीप संस्थेची हाेणारी गैरसाेय दूर हाेण्यास मदत झाली आहे.

रत्नागिरी येथे विशेष मुलांची कार्यशाळा ‘आशादीप’ कार्यरत असून, त्यांचे काम अजोड आहे. या संस्थेला लोखंडी कपाट आवश्यक असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर रत्नागिरी ग्रामीण उपविभागातील उपकार्यकारी अभियंता ओंकार डांगे यांनी याबाबत कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना माहिती दिली. सर्वांनी स्वयंस्फूर्तीने वैयक्तिक पातळीवर वर्गणी गोळा केली. या पैशातून एक लोखंडी कपाट आशादीप संस्थेला कार्यकारी अभियंता रामलिंग बेले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या वेळी बेले यांनी आशादीप संस्थेच्या कामाची पाहणी करून त्यांचे कौतुक केले. तसेच भविष्यातही संस्थेला मदत करू, असेही आश्वासन दिले.

या वेळी ग्रामीणचे उपकार्यकारी अभियंता ओंकार डांगे, चाफे येथील उपकार्यकारी अभियंता मंगेश पाटील आदी कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते. आशादीप संस्थेचे संचालक दिलीप रेडकर यांनी महवितरण कंपनीचे कर्मचारी आणि अधिकारी यांचे नेहमीच चांगले सहकार्य मिळते असल्याचे सांगितले. संस्थेतर्फे नवीन इमारतीचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी मदत करावी, असेही आवाहन त्यांनी या वेळी केले आहे.

चाैकट

सामाजिक बांधिलकी

वीज वसुलीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कठाेर पावले उचलावी लागतात. मात्र, महावितरण कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी सातत्याने प्रयत्नपूर्वक जपली आहे. विविध गरीब वस्त्यांमध्ये धान्यवाटप, कोविड सेंटरमध्ये गरम पाण्यासाठी बाटल्या देणे एवढेच काय तर एकाकी वृद्ध महिलेला महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी स्वखर्चाने वीज कनेक्शन दिले. ‘त्या’ गरीब महिलेचे एक वर्षाचे वीज बिलही कर्मचाऱ्यांनी भरले आहे.