शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कोकण द्रुतगती महामार्ग होणार, ठाकरे सरकारचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 17:23 IST

शिवसेनेला साथ देणाऱ्या कोकणासाठी समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मुंबई ते गोव्यापर्यंत ५०० किलोमीटर लांबीचा कोकण द्रुतगती महामार्ग उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.

ठळक मुद्देचिर्ले-पत्रादेवी ५०० किलोमीटरसाठी ४ हजार कोटी खर्च येणार रेवस-अलिबाग-बाणकोट-जयगड-रत्नागिरी-देवगड-आरोंदामार्गे पत्रादेवीपर्यंत महामार्ग.

रत्नागिरी : शिवसेनेला साथ देणाऱ्या कोकणासाठी समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मुंबई ते गोव्यापर्यंत ५०० किलोमीटर लांबीचा कोकण द्रुतगती महामार्ग उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.

शिवडी - न्हावाशेवा सागरी सेतू रायगडमधील ज्या चिर्ले गावात संपतो, तेथून पुढे सागरी भागातून हा कोकण द्रुतगती महामार्ग रेवस, अलिबाग, बाणकोट, जयगड, रत्नागिरीमार्गे देवगड ते पुढे आरोंदा, पत्रादेवीपर्यंत जाणार आहे. ५०० किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी ४ ते ५ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.कोकण रेल्वे गेल्या दोन दशकांहून अधिक काळ कोकणातून धावत आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून कोकणच्या सागरी महामार्गाचे भिजत घोंगडे कायम आहे.

सागरी महामार्गासाठी प्रयत्न करूनही त्याला यश आलेले नाही. त्यामुळे शिवसेनेसाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा असा हा कोकण द्रुतगती महामार्ग प्रकल्प आता तरी मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू रायगडमधील ज्या चिर्ले येथे संपतो तेथून ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोवा सीमेवरील पत्रादेवीपर्यंत ५०० किलोमीटरचा हा कोकण द्रुतगती सागरी महामार्ग असेल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी विधानसभेत केली. त्यामुळे कोकणवासियांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

ठाकरे सरकारचे विधिमंडळ अधिवेशन शनिवारी संपले. मात्र, या अधिवेशनादरम्यान आठ दिवसांपूर्वी सागरी महामार्गाच्या संदर्भातील माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली होती. दोन वर्षांपूर्वीच केंद्र सरकारच्या सुचनेवरून रेवस - रेडी सागरी महामार्गासाठी पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाने केंद्राला या महामार्गाचा ४ हजार कोटींचा विकास आराखडा (डीपीआर) पाठविला होता.त्यानुसार महामार्ग दुपदरीकरणासाठी १० मीटर रुंदीचे डांबरीकरण व दोन्ही बाजुला प्रत्येकी दीड मीटर साईडपट्टी अशा स्वरुपाचा हा आराखडा आहे. मात्र, केंद्राकडून निधीअभावी अद्यापपर्यंत काहीच झालेले नाही. हा मार्ग केंद्राकडे हस्तांतरीतही झालेला नाही. त्यामुळे आता सागरी भागातून हा महामार्ग राज्य सरकारकडूनच विकसित केला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडी सरकारकडून तशी घोषणा अधिवेशनात करण्यात आली आहे.सागरी पर्यटन : व्यवसायाला अधिक गती येणारकोकणचा रखडलेला विकास गतिमान व्हावा, सागरी किनारपट्टी भागाचा विकास पर्यटनाच्या माध्यमातून व्हावा, यासाठीच राज्य सरकारने कोकण द्रुतगती महामार्ग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या महामार्गाच्या पूर्णत्त्वानंतर कोकणातील पर्यटनाला नक्कीच वेग येणार आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ (एमएमआरडीए)च्या माध्यमातून हा प्रकल्प पूर्ण होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

टॅग्स :highwayमहामार्गShiv SenaशिवसेनाRatnagiriरत्नागिरी